शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

जलयुक्त शिवारामुळे स्रोताला फुटतोय पाझर

By admin | Updated: March 26, 2016 00:32 IST

जिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते.

जनावरांना पाण्याची सोय : पिकांनाही मिळणार पाण्यामुळे जीवदान, शेतकरी सुखावलेशंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवतीजिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते. एवढेच नाही तर जनावरांनाही याचा फटका सहन करावा लागतो. मात्र यावर्षी या तालुक्याचे चित्र काही अंशी पालटले आहे. शासनाच्या जलशिवार योजनेमुळे या परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.जिवती तालुक्यात शासनाची जलशिवार योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे. गेल्या एक-दोन वर्षांत शासनाचे हे काम सुरळीत सुरू आहे. या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे पाण्याचा साठा कसा होईल आणि शेती वा जनावरांच्या उपयोगी तो पाणी साठा कसा उपयोगी येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहे. आजच्या स्थितीत जिवती तालुक्यात जलशिवाराची कामे समाधानकारक आहेत. बंधारा असो की तलाव यामध्ये थोड्याप्रमाणात पाणी साचून आहे. हे पाणी जरी शेतीला कामात येत नसले तरी पाळीव तसेच जंगली प्राण्यांची तहाण भागवित आहे. जलशिवार योजनेनंतर परिसरातील नैसर्गिक झऱ्यांनाही पाझर फुटल्याचे दिसत आहे. ही योजना राबविण्यात वनविभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग यांनी मोलाचा पुढाकार घेतला आहे. जीवती तालुक्यातील नागरिकांना दरवर्षीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या जलशिवार योजनेचा या तालुक्याला फायदा मिळावा या हेतूने तत्कालिन कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी ही योजना भक्कमपणे राबविली. जलशिवार योजनेंतर्गत करण्यात आलेली कामेशासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत शेत तळे, वन तळे, सिमेंट बंधारे, ढाळीचे बंधारे, नाल्यातील उपसा काढून दगडाने पाणी अडविणे यासारखी कामे करण्यात आलीत. दगडाने बंधारा बांधून त्यावर जाळी पसरविणे, याला जाळीचे बंधारे म्हणतात. ही कामे जिवती तालुक्यात कृषी विभाग, वनविभाग आणि जलसंधारण विभागाने केलीत.योजनेतून लोकांना मिळाला रोजगारजलशिवार योजनेअंतर्गत तलावाची, बंधाऱ्याची विहिरीची जी कामे झालीत, त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळाला. एकीकडे या योजनेमार्फत पाण्याचा साठा वाढविता आला तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारी मिळाली, हे विशेष.