शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारामुळे स्रोताला फुटतोय पाझर

By admin | Updated: March 26, 2016 00:32 IST

जिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते.

जनावरांना पाण्याची सोय : पिकांनाही मिळणार पाण्यामुळे जीवदान, शेतकरी सुखावलेशंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे जिवतीजिवती तालुक्याला दरवर्षीच पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. अनियमित पावसामुळे तसेच तसेच अल्पवृष्टीमुळे येथील जनजीवन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रभावित होते. एवढेच नाही तर जनावरांनाही याचा फटका सहन करावा लागतो. मात्र यावर्षी या तालुक्याचे चित्र काही अंशी पालटले आहे. शासनाच्या जलशिवार योजनेमुळे या परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे.जिवती तालुक्यात शासनाची जलशिवार योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहे. गेल्या एक-दोन वर्षांत शासनाचे हे काम सुरळीत सुरू आहे. या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे या योजनेंतर्गत शेत तलाव, वनतलाव, सिमेंट बंधारे याद्वारे पाण्याचा साठा कसा होईल आणि शेती वा जनावरांच्या उपयोगी तो पाणी साठा कसा उपयोगी येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहे. आजच्या स्थितीत जिवती तालुक्यात जलशिवाराची कामे समाधानकारक आहेत. बंधारा असो की तलाव यामध्ये थोड्याप्रमाणात पाणी साचून आहे. हे पाणी जरी शेतीला कामात येत नसले तरी पाळीव तसेच जंगली प्राण्यांची तहाण भागवित आहे. जलशिवार योजनेनंतर परिसरातील नैसर्गिक झऱ्यांनाही पाझर फुटल्याचे दिसत आहे. ही योजना राबविण्यात वनविभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग यांनी मोलाचा पुढाकार घेतला आहे. जीवती तालुक्यातील नागरिकांना दरवर्षीच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या जलशिवार योजनेचा या तालुक्याला फायदा मिळावा या हेतूने तत्कालिन कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी ही योजना भक्कमपणे राबविली. जलशिवार योजनेंतर्गत करण्यात आलेली कामेशासनाच्या जलशिवार योजनेंतर्गत शेत तळे, वन तळे, सिमेंट बंधारे, ढाळीचे बंधारे, नाल्यातील उपसा काढून दगडाने पाणी अडविणे यासारखी कामे करण्यात आलीत. दगडाने बंधारा बांधून त्यावर जाळी पसरविणे, याला जाळीचे बंधारे म्हणतात. ही कामे जिवती तालुक्यात कृषी विभाग, वनविभाग आणि जलसंधारण विभागाने केलीत.योजनेतून लोकांना मिळाला रोजगारजलशिवार योजनेअंतर्गत तलावाची, बंधाऱ्याची विहिरीची जी कामे झालीत, त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या हाताला रोजगार मिळाला. एकीकडे या योजनेमार्फत पाण्याचा साठा वाढविता आला तर दुसरीकडे मजुरांना रोजंदारी मिळाली, हे विशेष.