शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

तीन वर्षांपासून निवासी अतिक्रमणांचे प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:35 IST

करडी (पालोरा) : ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या धोरणाचा भाग म्हणून शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी ...

करडी (पालोरा) : ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या धोरणाचा भाग म्हणून शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत प्रस्ताव सादर केले आहेत. सदर प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. ग्रामपंचायतींमार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात येत असतानाही अजूनपर्यंत शासन प्रशासनाकडून योग्य ती कारवाई झालेली नाही. त्यामुळे लाखो अतिक्रमणधारक हक्काच्या घरकुलांच्या योजनांपासून वंचित आहेत.

ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयाद्वारे केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्यपुरस्कृत रमाई आवास, शबरी आवास इतर योजनांची अंमलबजावणी राज्यात केली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निवड २०११ च्या सामाजिक व आर्थिक व जात सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रती घरकुल एक लाख २० हजार रुपये, डोंगराळ व नक्षलग्रस्त भागातील लाभार्थ्यांसाठी एक लाख ३० हजार रुपये या व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो योजनेतून अकुशल मजुरीच्या स्वरूपात ९० दिवसांच्या मजुरीसाठी १८ हजार रुपये व शौचालय बांधल्यास स्वच्छ भारत अभियानातून १२ हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाते. उपरोक्त परिपत्रकानुसार केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी केलेल्या अतिक्रमित जागा निवासासाठी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. राज्याच्या ग्रामविकास विभागाने २४ डिसेंबर २०१८ च्या पत्रान्वये सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंदीबाबत कारवाई करण्याबाबत मार्गदर्शक स्पष्ट सूचना, निर्देश दिले आहे.

संदर्भीय पत्र क्रमांक ४ अन्वये परिशिष्ट क प्रमाणे अतिक्रमण स्थळाची पाहणी करून ग्रामसेवक लॉगिनमधून ॲपमध्ये अतिक्रमणधारकांची फोटो व माहिती अपलोड करावयाची होती. २९ डिसेंबर २०१८ पर्यंत माहिती मोबाईल ॲपमध्ये भरून सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर मान्यतेचे आदेश केंद्र संचालकांद्वारे स्कॅन करून अपलोड करावयाचे होते. सदर नोंदीस ग्रामसेवकाने ऑनलाईन प्रमाणित करावे. संगणकीय प्रणालीद्वारे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काचे मागणीपत्र

संगणकीय प्रणालीद्वारे प्रत काढून संबंधितांना बजावायचे होते.

पालकमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा

२०१८ मध्ये निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी करून निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करून लाखो अतिक्रमणधारकांना न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाचे कार्यकारिणी सदस्य तथा हरदोली ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव देंगे यांनी दिले होते. तसेच न्यायाची अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु तत्कालीन पालकमंत्री गरजूंना न्याय देण्यात अपयशी ठरले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सुनील केदार यांच्या जागी तरुण व उत्साही लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले विश्वजित कदम पालकमंत्री आहेत. त्यांच्या साथीला धडाडीचे लोकप्रतिनिधी नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत. या सर्वांनी सदर अडचण सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

आम्हालाही हक्काचे घर द्या हो !

सर्वांना घरकुले मिळत आहेत; परंतु अतिक्रमण असल्याच्या नावाखाली फक्त गरिबांना अडविली जात आहेत. गरिबांना हक्काचे घर नसावे का? मालकीची जागा आमच्याकडे नाही, विकत घेण्यासाठी पैसा नाही. आम्ही पोट भरावे, की फक्त जागा विकत घ्यावी? आम्हालाही हक्काचे घर द्या हो, असे आर्जव अतिक्रमणधारकांकडून केले जात आहे.