शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

समृध्दग्राम योजनेसाठी १९६ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव

By admin | Updated: August 23, 2014 01:30 IST

ग्रामीण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे काळाची गरज आहे.

प्रशांत देसाई भंडाराग्रामीण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करणे काळाची गरज आहे. पर्यावरण संतुलन ठेऊन ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल, यासाठी पर्यावरण संतुलित समृध्दग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून त्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने पाठविले आहे. लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) व शिवनी (मोगरा) या ग्रामपंचायतींना नागपूर विभागातून पर्यावरण विकासरत्न पुरस्कार घोषीत झाला आहे. मागील तीन वर्षात या योजनेत सहभागी ग्रामपंचायतींसाठी शासनाकडून २३ कोटींचा निधी भंडारा जिल्हा परिषदेला मिळाला आहे. पर्यावरण संतुलित समृध्दग्राम योजना सन २०१०-११ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहे. सलग तीन वर्ष निकष पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींची योजनेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करूनच समृध्द व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज आहे. यासाठी जल, जमीन, जंगल, हवा व वनस्पती यांचे योग्य व्यवस्थापन करून भौतिक सोयी सुविधांची निर्मिती पर्यावरण संतुलन राखून केल्यास ग्रामस्थांना राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.भू-व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा, मनुष्यविष्ठा, वैयक्तिक स्वच्छता, ऊर्जा, जमिनीची धूप, अंतर्गत रस्ते विकास, वृक्षारोपण, सामाजीक वनीकरण, उद्याने आणि नागरिकांच्या सहभागातून विविध योजना एकात्मिक पध्दतीने राबवून गावाला समृध्द बनविणे हा यामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर व पवनी या तालुक्यांनी पर्यावरण संतुलित समृध्दग्राम योजनेत सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ४८८ ग्रामपंचायती पात्र झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वर्षीसाठी अपात्र व नवीन २५२ ग्रामपंचायतींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्यावर्षी १८७ ग्रामपंचायतींचा पात्र ठरल्या आहेत. चौथ्या वर्षी जिल्हा परिषदने १९६ ग्रामपंचायतींचा प्रस्ताव पाठविला आहे. तीन वर्षात शासनाचे निकष पूर्ण न करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. पहिल्या वर्षी ५३ ग्रामपंचायती, दुसऱ्या वर्षी २८९, तिसऱ्यावर्षी ३५५ तर चौथ्या वर्षी ११९ ग्रामपंचायती अपात्र ठरल्या आहेत.