शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्ताची २० वर्षांपासून नोकरीसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:04 IST

पेंच प्रकल्पात सर्वस्व गमावून बसलेला मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील एक तरुण शासकीय नोकरीसाठी भटकंती करीत आहे. प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. परंतु २० वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाचे झिजवितो उंबरठे ।कालव्यात शेती अधिग्रहण, आत्मदहनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पात सर्वस्व गमावून बसलेला मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील एक तरुण शासकीय नोकरीसाठी भटकंती करीत आहे. प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. परंतु २० वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नाही. आता नोकरीचे वयही उलटत चालले आहे. त्यामुळे नोकरी मिळाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्ताने दिला आहे.दिनेश गजभिये असे या प्रकल्पग्रस्ताचे नाव आहे. १९९९ मध्ये त्याची दोन एकर जमीन पेंच प्रकल्पाच्या कालव्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली. त्यावेळी त्याला सरकारी नोकरीसाठी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र २० वर्षांपासून तो हे प्रमाणपत्र घेऊन नोकरीसाठी भटकंती करीत आहे. परंतु नोकरी लागली नाही.विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते. तर शासकीय नियमानुसार सरकारी नोकरीतही समावून घेण्याचे प्रावधान आहे. यानंतरही २० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त दिनेश गजभिये न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. दिनेश म्हणाला, अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीही हालचाल झाली नाही. अत्यंत विपरित परिस्थितीत जीवन जगत असून आता नोकरीचे वयही निघून जात आहे.प्रकल्पग्रस्त दिनेश गजभिये आता ४५ वर्षाचा होत आहे. त्यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. जमिन अधिग्रहीत केल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. परिवाराला उपासमारीचा सामना करावा लागतो. माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्याला आंधळगाव पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्याचे बयाण घेतले. परंतु अद्यापपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही.