शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

२४ कोटींचा प्रकल्प १४०० कोटींवर

By admin | Updated: August 4, 2015 00:26 IST

बावनथडी आंतरराज्यीय (राजीव सागर) प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी १३० कोटींची गरज आहे. ११ कोटी ६६ लाखांचा प्रकल्प ८१३.८५ कोटींवर पोहोचला आहे.

शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत : बावनथडी प्रकल्प लालफीतशाहीत अडकला तुमसर : बावनथडी आंतरराज्यीय (राजीव सागर) प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी १३० कोटींची गरज आहे. ११ कोटी ६६ लाखांचा प्रकल्प ८१३.८५ कोटींवर पोहोचला आहे. कायद्याच्या कचाट्यात प्रकल्प सापडल्यानेच मागील ३५ वर्षांपासून रखडला आहे. जून २०१७ मध्ये प्रकल्प पूर्णत्वाची तारीख राज्य शासनाने दिली असतानाही त्याच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सध्या प्रकल्पात केवळ १६.७४ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. येथे तांत्रिक स्टॉफ केवळ ५० टक्के आहे. १७ हजार ५०० हेक्टर सिंचन क्षमता असूनही सध्या केवळ ७ हजार हेक्टर शेतीचे सिंचन होत आहे. धरणात यावर्षी पाण्याचा ठणठणाट आहे.तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प व महाराष्ट्र शासनाचा संयुक्त्त प्रकल्प आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश शासन येथे संयुक्तरित्या खर्च करीत आहे. या संपूर्ण प्रकल्पाची सध्याची किंमत १६०० कोटींवर पोहोचली आहे. राज्य शासनाने १२ सप्टेंबर १९७५ मध्ये ११ कोटी ६६ लक्ष दरसूचीला प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रथम सुधारित मान्यता सन १२ आॅगस्ट १९९३ ला ७१ कोटी ७९ लाख, द्वितीय सुधारित मान्यता ७ डिसेंबर २००१ ला १८२ कोटी १ लाख, तृतीय सुधारित मान्यता २५ आॅगस्ट २००९ ला ५६१ कोटी २६ लाख, चतुर्थ सुधारित मान्यता (प्रस्तावित) ८१३ कोटी ८५ लाख, करण्यात आली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण मान्यता २८ एप्रिल १९८९, केंद्रीय जल आयोग मान्यता २१ मे २०१० ला, नियोजन आयोगाची मान्यता १५ सप्टेंबर २०१०, वन जमिनीस अंतिम मान्यता २० एप्रिल २०१० ला तर वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमात अंतर्भूत सन २००४-२००५ मध्ये करण्यात आली.प्रकल्पाचे मुख्य कार्यालय गोंदिया शहरात आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ५० टक्केच तांत्रिक कर्मचारी शिल्लक आहेत. महाराष्ट्र उजवा कालवा मुख्य कालवा असून त्यांची लांबी २६ किमी इतकी आहे. वितरीकेची कामे ३० ते ३५ टक्के शिल्लक आहेत. तुमसर उपविभागात सुकळी, देव्हाडी तथा मोहाडी तालुक्यातील गावांचा समावेश आहे. बघेडा उपविभागीय तुमसर, बोरी, राजापूर येथील कामे शिल्लक आहेत. भूसंपादन येथे ६० ते ७० कोटी खर्च येणार आहे. सुमारे १४५ प्रकरणे शिल्लक आहेत. यात ३५१.९४ हेक्टर शेतीचा समावेश आहे. प्रकल्पाच्या पुर्णत्वाकरिता पुन्हा किमान १३० कोटी निधीची गरज आहे. सध्या केवळ सात हजार शेतीलाच सिंचन उपलब्ध होत आहे. यात मागील पावसाळी हिवाळी व उन्हाळी पिकांना सिंचनाची सोय करुन देण्यात आली होती. सध्या प्रकल्पात केवळ १६.७४ टक्के जलसाठा म्हणजे ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणाची क्षमता २१७.३२ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यावर्षी पाऊस न झाल्याने धरणात ठणठणाट आहे. (तालुका प्रतिनिधी)