शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

न्यायानुसारच बदली प्रक्रियेला प्राधान्य

By admin | Updated: May 14, 2016 00:28 IST

जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची स्थांनातरण प्रक्रिया राबविण्यात येत असून हे स्थांनातरण नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी : जिल्हा परिषदेत कर्मचारी बदली सत्रभंडारा : जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची स्थांनातरण प्रक्रिया राबविण्यात येत असून हे स्थांनातरण नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. याशिवाय कुणावरही अन्याय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली असून कर्मचाऱ्यांना न्यायानुसार प्राधान्यक्रम दिल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्ह्यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अनेक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या बदल्याही नियमानुसारच करण्यात येत आहे. या बदली प्रक्रियेदरम्यान जे बदलीस पात्र आहेत त्याच शिक्षकांना बोलाविण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी पोलीस असले तरी त्यांच्यापासून कुणालाही त्रास नाही. शिस्त पालनासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे. ही बदली प्रक्रिया न्यायपूर्ण पद्धतीनेच होत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. त्यानुसार ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होत आहेत. ही प्रक्रिया जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होत आहे. ११ मे रोजी सकाळी १० पासून शिक्षण विभाग (माध्यमिक), १२ व १३ मे शिक्षण विभाग (प्राथमिक) असे बदल्यांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. बदल्या करताना नक्षलग्रस्त भागात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आला आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय दृष्टिने बदली करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विनंती बदली करण्यात येत आहे. पक्षघाताने आजारी, अपंग, हदयरोग, किडणीरोग, कर्करूग्ण, सैनिकांची पत्नी, विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या, वयाचे ५३ वर्ष पूर्ण करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती बदली करताना अट शिथील करण्यात आली आहे. प्रशासकीय बदलीतही सवलत देण्यात आली आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वीही आक्षेप मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी सूचना फलकावर लावण्यात येणार असल्याचेही राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)