शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायानुसारच बदली प्रक्रियेला प्राधान्य

By admin | Updated: May 14, 2016 00:28 IST

जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची स्थांनातरण प्रक्रिया राबविण्यात येत असून हे स्थांनातरण नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी : जिल्हा परिषदेत कर्मचारी बदली सत्रभंडारा : जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची स्थांनातरण प्रक्रिया राबविण्यात येत असून हे स्थांनातरण नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. याशिवाय कुणावरही अन्याय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली असून कर्मचाऱ्यांना न्यायानुसार प्राधान्यक्रम दिल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्ह्यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अनेक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या बदल्याही नियमानुसारच करण्यात येत आहे. या बदली प्रक्रियेदरम्यान जे बदलीस पात्र आहेत त्याच शिक्षकांना बोलाविण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी पोलीस असले तरी त्यांच्यापासून कुणालाही त्रास नाही. शिस्त पालनासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे. ही बदली प्रक्रिया न्यायपूर्ण पद्धतीनेच होत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. त्यानुसार ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होत आहेत. ही प्रक्रिया जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होत आहे. ११ मे रोजी सकाळी १० पासून शिक्षण विभाग (माध्यमिक), १२ व १३ मे शिक्षण विभाग (प्राथमिक) असे बदल्यांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. बदल्या करताना नक्षलग्रस्त भागात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आला आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय दृष्टिने बदली करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विनंती बदली करण्यात येत आहे. पक्षघाताने आजारी, अपंग, हदयरोग, किडणीरोग, कर्करूग्ण, सैनिकांची पत्नी, विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या, वयाचे ५३ वर्ष पूर्ण करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती बदली करताना अट शिथील करण्यात आली आहे. प्रशासकीय बदलीतही सवलत देण्यात आली आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वीही आक्षेप मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी सूचना फलकावर लावण्यात येणार असल्याचेही राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)