शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य द्या

By admin | Updated: July 10, 2016 00:22 IST

जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून भंडारा जिल्ह्यातील यंत्रणांनी जलयुक्त शिवारच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश...

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जलयुक्त शिवारच्या प्रगतीचा आढावा,२०१६-१७ चा आराखडा सादर कराभंडारा : जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून भंडारा जिल्ह्यातील यंत्रणांनी जलयुक्त शिवारच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. २०१६-१७ च्या कामांचे आराखडे तात्काळ सादर करून निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी बैठकीत २०१५-१६ मधील ८३ गावातील जलयुक्त शिवारच्या कामांचा यंत्रणा व तालुका निहाय आढावा घेतला. २०१५-१६ मध्ये झालेल्या प्रत्येक कामाला उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देवून कामाची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वर्षातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत, असे त्यांनी सांगितले.बैठकीत २०१५-१६ ची सर्व यंत्रणेची गाव निहाय प्रस्तावित कामे, पूर्ण कामे तसेच अपूर्ण कामे, विशेष निधी व सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त निधी खर्च आणि शिल्लक निधी व त्यांची कारणे, यंत्रनिहाय १०० टक्के व ८० टक्के तसेच ५० पूर्ण झालेली गावे, पूर्ण केलेल्या कामांमुळे निर्माण झालेला पाणी साठा, जलयुक्त शिवार अभियान, तालुकास्तरीय समितीची १०० टक्के कामे झालेली गावे, यंत्रणांनी सिमनिकवर अपलोड केलेली कामे व भायाचित्रे, २०१६-१७ अंतर्गत भंडारा, तुमसर, मोहाडी व पवनी यांनी गाव आराखडे सादर करणे व मागेल त्याला शेततळे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी दर सोमवारी तालुकास्तरीय बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा व या बैठकीचा अहवाल जिल्हा समितीला द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अपूर्ण कामांना तसेच कंत्राटदारांनी जी कामे केली नाहीत, त्या कामांना तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देवून कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ज्या कंत्राटदारांनी कामे अर्धवट ठेवली किंवा सुरु केली नाही अशा कंत्राटदारांना नोटीस देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. २०१६-१७ चे आराखडे तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात यावेत. जलयुक्त शिवार मधून एरिया ट्रिटमेंटची कामे करण्यात यावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व यंत्रणांनी प्रत्येक कामाचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात भंडारा जिल्ह्यातील ५९ गावाची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावात प्रस्तावित कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीस अभियानातील यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)