शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य द्या

By admin | Updated: July 10, 2016 00:22 IST

जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून भंडारा जिल्ह्यातील यंत्रणांनी जलयुक्त शिवारच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश...

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जलयुक्त शिवारच्या प्रगतीचा आढावा,२०१६-१७ चा आराखडा सादर कराभंडारा : जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून भंडारा जिल्ह्यातील यंत्रणांनी जलयुक्त शिवारच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. २०१६-१७ च्या कामांचे आराखडे तात्काळ सादर करून निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी बैठकीत २०१५-१६ मधील ८३ गावातील जलयुक्त शिवारच्या कामांचा यंत्रणा व तालुका निहाय आढावा घेतला. २०१५-१६ मध्ये झालेल्या प्रत्येक कामाला उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देवून कामाची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वर्षातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत, असे त्यांनी सांगितले.बैठकीत २०१५-१६ ची सर्व यंत्रणेची गाव निहाय प्रस्तावित कामे, पूर्ण कामे तसेच अपूर्ण कामे, विशेष निधी व सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त निधी खर्च आणि शिल्लक निधी व त्यांची कारणे, यंत्रनिहाय १०० टक्के व ८० टक्के तसेच ५० पूर्ण झालेली गावे, पूर्ण केलेल्या कामांमुळे निर्माण झालेला पाणी साठा, जलयुक्त शिवार अभियान, तालुकास्तरीय समितीची १०० टक्के कामे झालेली गावे, यंत्रणांनी सिमनिकवर अपलोड केलेली कामे व भायाचित्रे, २०१६-१७ अंतर्गत भंडारा, तुमसर, मोहाडी व पवनी यांनी गाव आराखडे सादर करणे व मागेल त्याला शेततळे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी दर सोमवारी तालुकास्तरीय बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा व या बैठकीचा अहवाल जिल्हा समितीला द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अपूर्ण कामांना तसेच कंत्राटदारांनी जी कामे केली नाहीत, त्या कामांना तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देवून कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ज्या कंत्राटदारांनी कामे अर्धवट ठेवली किंवा सुरु केली नाही अशा कंत्राटदारांना नोटीस देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. २०१६-१७ चे आराखडे तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात यावेत. जलयुक्त शिवार मधून एरिया ट्रिटमेंटची कामे करण्यात यावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व यंत्रणांनी प्रत्येक कामाचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात भंडारा जिल्ह्यातील ५९ गावाची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावात प्रस्तावित कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीस अभियानातील यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)