शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे ...

या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, आदी बाबींकरिता नुकसानभरपाई देय आहे. योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ २३ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) सन २०२१-२२ अंतर्गत धान व सोयाबीन दोन्ही पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याकरिता एचडीएफसी इर्गो इन्सुरंस क. लि. मुंबई ही इन्सुरंस कंपनी निश्चित झालेली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत धान पीक (खरीप हंगाम) करिता शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रक्कम रुपये ७६० प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये ३८,००० हजार रुपये प्रति हेक्टर आहे. तसेच सोयाबीन पीक (खरीप हंगाम)करिता विमा हप्त्याची रक्कम रुपये ५५० प्रति हेक्टर असून, विमा संरक्षित रक्कम रुपये २७,५०० प्रति हेक्टर आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्र, पिके, विमा हप्ता व योजनेच्या इतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून योजनेबाबत माहिती वेळोवळी शेतकऱ्यांना पाहता येणार आहे.

बॉक्स

पावसाच्या दडीमुळे पीक विम्याकडे वाढला कल

जुलै महिना संपत आला तरी अद्यापही जोरदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने जिल्ह्यात धान राेवणीची कामे रखडली आहेत. अवर्षणाची स्थिती असल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत ८० हजारांच्या आसपास शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे कल वाढला असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूरक्षेत्र, जलमय होणे, भूस्खलन, आदी बाबींमध्ये उत्पादनात येणारी घट पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात येते.

कोट

गतवर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सन २०२१- २२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग होण्यासाठी शासनाने २३ जुलै २०२१ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा