शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

प्राथमिक स्त्रोताची शेती न परवडणारीच

By admin | Updated: August 27, 2015 00:59 IST

जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला शासन व राजकीय पुढारी गोंजरवितात पण, प्रत्यक्षात तसं काही होत नाही.

मोहाडी : जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला शासन व राजकीय पुढारी गोंजरवितात पण, प्रत्यक्षात तसं काही होत नाही. तथापि, प्राथमिक स्त्रोत समजणारी शेतीला अलिकडच्या काळात केवळ जगण्याचं साधन मानलं गेलं आहे. आता ही शेती न परवडणारीच आहे, असे प्रत्येक शेतकरी बोलून दाखवित आहेत.पूर्व विदर्भात असणाऱ्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये भाताचे पीक घेतले जाते. शेतकऱ्यांनी परंपरागत शेती भात पिकाचीच आहे. पूर्वी शेती प्राथमिक स्त्रोताची मानली जायची. अलिकडच्या काळात प्राथमिक स्त्रोत दुध दुभत्याला देवू लागली आहेत. धानाची शेती फक्त शेतकऱ्यांच जीवन जगण्याचा साधन झाली आहे. जगणारे घटक वाढले असल्याने शेतीत राबणे आता न परवडणारी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.धान पिकाच्या उत्पादनासाठी शेतकरी साधारणत: सहा-सात महिने शेतात राबतो. घरापर्यंत धान्य येण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच कार्यपद्धतीतून जावे लागते. धान शेतीचा हंगाम सुरू मे मध्ये सुरू होते. शेतातील अनावश्यक काडी कचरा नष्ट करणे, पऱ्हा लावणीसाठी जमिन तयार करणे, चिराटा, पऱ्हा घालणे, सिंचन करणे, रोप वाढली त्यासाठी चिखल तयार करणे, पऱ्हा काढणे, रोवणी लावणे, खत देणे, निंदन करणे, धानकापणी, धान एकत्रीत करणे, मळणी त्यानंतर उत्पादित झालेला धान्य घरी आणणे. शेवटी त्याची विक्री करणे आदी प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला साधारणत: पंधरा ते १७ हजार रूपयाचा एकरी खर्च येत असतो. उत्पादित धानाचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांकडे काहीच उरत नाही. त्यामुळे धान उत्पादित करणारा शेतकरी कर्जातच मातीत मिसळतो. धान उत्पादक करणारा शेतकरी संपन्न परिस्थितीत जीवन जगत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे थोडे चांगले जीवन जगण्यासाठी शेतकरी दुध दुभते, शेळीपालन, कोंबडी पालन या पुरक व्यवसायाकडे वळला आहे. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात दुध दुभते. व्यवसायाला प्राथमिक स्त्रोत मानू लागला आहे. ज्या भागात सिंचनाची सोय नाही कोरडवाहू शेती आहे या भागातील ९० टक्के शेतकरी दुध दुभते, बकऱ्या व कुक्कूटपालनाचा आधार घेत आहेत. ५० वर्षापुर्वी शेतीचा सकल स्थूल उत्पन्न ५० टक्के होता. आता तो १४ टक्के झाला आहे. त्यामुळे शेतीचा सेक्टर अतिशय गरीब झाला आहे. शेतकऱ्यांनी आता शासनाच्या भरवश्यावर राहू नये. तसेच शेती परवडत नाही हा ओरडा करू नये. स्वत:च शेतकऱ्यांनी पर्याय शोधले पाहिजेत. पीक बदलविला पाहिजे. ऋतू हवामानानुसार शेती केली पाहिजे. ज्या पिकाची किंंमत जास्त आहे. त्या पिकाचे उत्पादन केल गेलं पाहिजे. परिस्थिती साधून शेतकऱ्यांनी शेती करावी. ज्ञानाची तंत्रज्ञानाची शेती करण्याची गरज आहे. कारण तांदूळ हा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे भविष्यात धानाच्या किंमतीत वाढ होईल याची शाश्वती कमीच आहे. यासाठी शासनाने आधारभूत केंद्रातून धानाची किंमत वाढली पाहिजे, अस करण्यासाठी शासनच पुढे येवून शेतकऱ्यांना तारू शकतो. तसेच राज्य, प्रांतानुसार किमान आधारभूत किंमत असली पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)