शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

रासायनिक खताच्या किमती कंपन्यानी परस्पर वाढविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

दिघोरी (माेठी) : कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खतांच्या कमी झालेल्या नवीन दरांची अंमलबजावणी करण्याचे जाहिर केले ...

दिघोरी (माेठी) : कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खतांच्या कमी झालेल्या नवीन दरांची अंमलबजावणी करण्याचे जाहिर केले हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला हाेता. मात्र आता महिना उलटत नाही ताेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या खताच्या कमाल किंमतीमध्ये ७५ रुपयांची दरवाढ जाहीर केली. शासनाच्या आदेशाला बगल देण्यात येत असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.

गत मे महिन्यात कच्चा मालाच्या किंमती वाढल्याचे कारण पुढे करीत रासायनिक खते इतर कंपन्यांनी खताची दरवाढ केली हाेती. त्यामुळे एका खताच्या गाेणीमागे पाचशे ते सातशे रुपये अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत हाेता. मात्र शासनाने वेळीच दखल घेत खत उत्पादक आणि वितरक कंपन्यांना खतावरील अनुदान वाढवून दिले त्यामुळे खत दरवाढीचा तिढा सुटला. त्याअनुषंगाने २० मे पासून कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खताच्या कमी झालेल्या दराची अंमलबजावणी हाेत असल्याचे सांगितले. कपंनीनिहाय आणि ग्रेड निहाय रासायनिक खतांचे दर जाहीर करण्यात आले. मात्र महिना उलटत नाही ताेच एका इंटरनॅशनल कंपनीने आपल्या कमाल विक्री किमंतीमध्ये ७५ रुपयांची दरवाढ केली आहे. यापूर्वी या कंपनीच्या २०:२०:००:१३ या ग्रेडची कमाल विक्री किंमत १०५० जाहीर केली हाेती. परंतु आता या खताची किंमत ११२५ रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा भुर्दंड बसणार आहे. एकीकडे शासनाने सर्व कंपन्यांना रासायनिक खताचे दर ठरवून दिले आहे. तरीही काही कंपन्या खताच्या किंमती वाढवित आहे. याचा शेतकऱ्यांना माेठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शासनाने यावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

काेट

कंपन्यांनी खताची केलेली दरवाढ अत्यंत निंदनीय आहे. अधिकचा नफा कमविण्याच्या हा प्रकार आहे. खताची दरवाढ मागे न घेतल्यास जिल्हा ॲग्राे डिलर असाेशिएशनच्या वतीने दरवाढ करणाऱ्या कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येईल.

- माेरेश्वर बाेरकर, अध्यक्ष, जिल्हा ॲग्राेडिलर असाेशिएशन

काेट

आंतरंराष्ट्रीय बाजारपेठेत रासायनिक खत तयार करण्याच्या कच्च्या मालात वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ करावी लागते. वाढीव दर १ जुलैपासून लागू झाले आहेत. कच्चा मालाच्या दरात घसरण झाली की खताचे दरही कमी हाेतील. काेणतीही कंपनी घाट्याच्या व्यवसाय करु शकत नाही.

- भुपेंद्र सिंग, प्रादेशिक व्यवस्थापक काेराेमंडल इंटरनॅशनल