शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या किमती कंपन्यानी परस्पर वाढविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST

दिघोरी (माेठी) : कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खतांच्या कमी झालेल्या नवीन दरांची अंमलबजावणी करण्याचे जाहिर केले ...

दिघोरी (माेठी) : कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खतांच्या कमी झालेल्या नवीन दरांची अंमलबजावणी करण्याचे जाहिर केले हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला हाेता. मात्र आता महिना उलटत नाही ताेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या खताच्या कमाल किंमतीमध्ये ७५ रुपयांची दरवाढ जाहीर केली. शासनाच्या आदेशाला बगल देण्यात येत असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.

गत मे महिन्यात कच्चा मालाच्या किंमती वाढल्याचे कारण पुढे करीत रासायनिक खते इतर कंपन्यांनी खताची दरवाढ केली हाेती. त्यामुळे एका खताच्या गाेणीमागे पाचशे ते सातशे रुपये अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत हाेता. मात्र शासनाने वेळीच दखल घेत खत उत्पादक आणि वितरक कंपन्यांना खतावरील अनुदान वाढवून दिले त्यामुळे खत दरवाढीचा तिढा सुटला. त्याअनुषंगाने २० मे पासून कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खताच्या कमी झालेल्या दराची अंमलबजावणी हाेत असल्याचे सांगितले. कपंनीनिहाय आणि ग्रेड निहाय रासायनिक खतांचे दर जाहीर करण्यात आले. मात्र महिना उलटत नाही ताेच एका इंटरनॅशनल कंपनीने आपल्या कमाल विक्री किमंतीमध्ये ७५ रुपयांची दरवाढ केली आहे. यापूर्वी या कंपनीच्या २०:२०:००:१३ या ग्रेडची कमाल विक्री किंमत १०५० जाहीर केली हाेती. परंतु आता या खताची किंमत ११२५ रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा भुर्दंड बसणार आहे. एकीकडे शासनाने सर्व कंपन्यांना रासायनिक खताचे दर ठरवून दिले आहे. तरीही काही कंपन्या खताच्या किंमती वाढवित आहे. याचा शेतकऱ्यांना माेठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शासनाने यावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

काेट

कंपन्यांनी खताची केलेली दरवाढ अत्यंत निंदनीय आहे. अधिकचा नफा कमविण्याच्या हा प्रकार आहे. खताची दरवाढ मागे न घेतल्यास जिल्हा ॲग्राे डिलर असाेशिएशनच्या वतीने दरवाढ करणाऱ्या कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येईल.

- माेरेश्वर बाेरकर, अध्यक्ष, जिल्हा ॲग्राेडिलर असाेशिएशन

काेट

आंतरंराष्ट्रीय बाजारपेठेत रासायनिक खत तयार करण्याच्या कच्च्या मालात वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ करावी लागते. वाढीव दर १ जुलैपासून लागू झाले आहेत. कच्चा मालाच्या दरात घसरण झाली की खताचे दरही कमी हाेतील. काेणतीही कंपनी घाट्याच्या व्यवसाय करु शकत नाही.

- भुपेंद्र सिंग, प्रादेशिक व्यवस्थापक काेराेमंडल इंटरनॅशनल