शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:50 IST

भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना ....

ठळक मुद्देसुहास दिवसे : जिल्हा पर्यावरण समितीची सभा, उद्योग व्यावसायिकांवर आता करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आनंद काटोले, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, भगवान मस्के, अशासकीय सदस्य रवी येळणे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालावर सखोल चर्चा करणे व शिफारसे करणे, जिल्ह्यातील पर्यावरणाचा ºहास झालेल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून अशा संसाधनाच्या संवर्धनासाठी शिफारस करणे, पर्यावरण विभागामार्फत कार्यरत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी, पर्यावरण आघात मुल्यांकन अहवाल व जनसुनावणी व पर्यावरण ºहासाबाबत प्राप्त होणाºया तक्रारींची स्थानिक पातळीवर त्वरीत दखल घेणे यासह पर्यावरण संवर्धनाच्या इतर मुद्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पर्यावरण समिती गठीत करण्यात आली आहे.जिल्ह्यातील स्थानिक संस्थांनी पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिकांनी अहवाल कसा तयार करावा याबाबत प्रादेशिक अधिकारी यांनी प्रशिक्षण द्यावे.२२ सप्टेंबर रोजी पवनी येथे मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत एक सादरीकरण करून याबाबतची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. यासोबतच जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असणाºया क्षेत्राचा सविस्तर अहवाल तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.वैनगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची अवस्था वाईट आहे. वनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत असून याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये पर्यावरणाचे निकष पाळले जातात किंवा नाही याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार चरण वाघमारे यांनी सूचविले. राईस मिल मधून निघणाºया धुळीच्या कणामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच प्रमाणे वैनगंगा नदीमधील इकॉर्निया वनस्पतीमुळे मासे मृत पावत आहेत. नदीचे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाला नुकसान होत आहे. या बाबीवर समितीने अभ्यास करून निर्णय घ्यावा असे मत आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी मानले.पर्यावरणाच्या उपाययोजनेबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. समितीची बैठक प्रत्येक तिमाहीला घेण्यात यावी. असे त्यांनी सूचविले. मोठे उद्योग असलेल्या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राईस मिल आणि उद्योग पर्यावरणाचे निकष पाळतात किंवा नाही याबाबतचा सविस्तर अहवाल समितीला सादर करण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सूचना दिल्या.