शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:50 IST

भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना ....

ठळक मुद्देसुहास दिवसे : जिल्हा पर्यावरण समितीची सभा, उद्योग व्यावसायिकांवर आता करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आनंद काटोले, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, भगवान मस्के, अशासकीय सदस्य रवी येळणे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालावर सखोल चर्चा करणे व शिफारसे करणे, जिल्ह्यातील पर्यावरणाचा ºहास झालेल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून अशा संसाधनाच्या संवर्धनासाठी शिफारस करणे, पर्यावरण विभागामार्फत कार्यरत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी, पर्यावरण आघात मुल्यांकन अहवाल व जनसुनावणी व पर्यावरण ºहासाबाबत प्राप्त होणाºया तक्रारींची स्थानिक पातळीवर त्वरीत दखल घेणे यासह पर्यावरण संवर्धनाच्या इतर मुद्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पर्यावरण समिती गठीत करण्यात आली आहे.जिल्ह्यातील स्थानिक संस्थांनी पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिकांनी अहवाल कसा तयार करावा याबाबत प्रादेशिक अधिकारी यांनी प्रशिक्षण द्यावे.२२ सप्टेंबर रोजी पवनी येथे मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत एक सादरीकरण करून याबाबतची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. यासोबतच जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असणाºया क्षेत्राचा सविस्तर अहवाल तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.वैनगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची अवस्था वाईट आहे. वनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत असून याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये पर्यावरणाचे निकष पाळले जातात किंवा नाही याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार चरण वाघमारे यांनी सूचविले. राईस मिल मधून निघणाºया धुळीच्या कणामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच प्रमाणे वैनगंगा नदीमधील इकॉर्निया वनस्पतीमुळे मासे मृत पावत आहेत. नदीचे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाला नुकसान होत आहे. या बाबीवर समितीने अभ्यास करून निर्णय घ्यावा असे मत आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी मानले.पर्यावरणाच्या उपाययोजनेबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. समितीची बैठक प्रत्येक तिमाहीला घेण्यात यावी. असे त्यांनी सूचविले. मोठे उद्योग असलेल्या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राईस मिल आणि उद्योग पर्यावरणाचे निकष पाळतात किंवा नाही याबाबतचा सविस्तर अहवाल समितीला सादर करण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सूचना दिल्या.