शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:50 IST

भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना ....

ठळक मुद्देसुहास दिवसे : जिल्हा पर्यावरण समितीची सभा, उद्योग व्यावसायिकांवर आता करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आनंद काटोले, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, भगवान मस्के, अशासकीय सदस्य रवी येळणे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालावर सखोल चर्चा करणे व शिफारसे करणे, जिल्ह्यातील पर्यावरणाचा ºहास झालेल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून अशा संसाधनाच्या संवर्धनासाठी शिफारस करणे, पर्यावरण विभागामार्फत कार्यरत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी, पर्यावरण आघात मुल्यांकन अहवाल व जनसुनावणी व पर्यावरण ºहासाबाबत प्राप्त होणाºया तक्रारींची स्थानिक पातळीवर त्वरीत दखल घेणे यासह पर्यावरण संवर्धनाच्या इतर मुद्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पर्यावरण समिती गठीत करण्यात आली आहे.जिल्ह्यातील स्थानिक संस्थांनी पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिकांनी अहवाल कसा तयार करावा याबाबत प्रादेशिक अधिकारी यांनी प्रशिक्षण द्यावे.२२ सप्टेंबर रोजी पवनी येथे मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत एक सादरीकरण करून याबाबतची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. यासोबतच जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असणाºया क्षेत्राचा सविस्तर अहवाल तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.वैनगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची अवस्था वाईट आहे. वनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत असून याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये पर्यावरणाचे निकष पाळले जातात किंवा नाही याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार चरण वाघमारे यांनी सूचविले. राईस मिल मधून निघणाºया धुळीच्या कणामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच प्रमाणे वैनगंगा नदीमधील इकॉर्निया वनस्पतीमुळे मासे मृत पावत आहेत. नदीचे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाला नुकसान होत आहे. या बाबीवर समितीने अभ्यास करून निर्णय घ्यावा असे मत आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी मानले.पर्यावरणाच्या उपाययोजनेबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. समितीची बैठक प्रत्येक तिमाहीला घेण्यात यावी. असे त्यांनी सूचविले. मोठे उद्योग असलेल्या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राईस मिल आणि उद्योग पर्यावरणाचे निकष पाळतात किंवा नाही याबाबतचा सविस्तर अहवाल समितीला सादर करण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सूचना दिल्या.