शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाबाबतचा सविस्तर अहवाल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 22:50 IST

भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना ....

ठळक मुद्देसुहास दिवसे : जिल्हा पर्यावरण समितीची सभा, उद्योग व्यावसायिकांवर आता करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्यातील पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाला प्रतिकूल असणाºया क्षेत्राची निवड करून पर्यावरण पूरक कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पर्यावरण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे, अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आनंद काटोले, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, भगवान मस्के, अशासकीय सदस्य रवी येळणे यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालावर सखोल चर्चा करणे व शिफारसे करणे, जिल्ह्यातील पर्यावरणाचा ºहास झालेल्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून अशा संसाधनाच्या संवर्धनासाठी शिफारस करणे, पर्यावरण विभागामार्फत कार्यरत असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी, पर्यावरण आघात मुल्यांकन अहवाल व जनसुनावणी व पर्यावरण ºहासाबाबत प्राप्त होणाºया तक्रारींची स्थानिक पातळीवर त्वरीत दखल घेणे यासह पर्यावरण संवर्धनाच्या इतर मुद्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पर्यावरण समिती गठीत करण्यात आली आहे.जिल्ह्यातील स्थानिक संस्थांनी पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, नगरपालिकांनी अहवाल कसा तयार करावा याबाबत प्रादेशिक अधिकारी यांनी प्रशिक्षण द्यावे.२२ सप्टेंबर रोजी पवनी येथे मुख्याधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत एक सादरीकरण करून याबाबतची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. यासोबतच जिल्ह्यातील पर्यावरणाला घातक असणाºया क्षेत्राचा सविस्तर अहवाल तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.वैनगंगा नदीकाठच्या गावातील शेतीची अवस्था वाईट आहे. वनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत असून याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये पर्यावरणाचे निकष पाळले जातात किंवा नाही याबाबत सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार चरण वाघमारे यांनी सूचविले. राईस मिल मधून निघणाºया धुळीच्या कणामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याच प्रमाणे वैनगंगा नदीमधील इकॉर्निया वनस्पतीमुळे मासे मृत पावत आहेत. नदीचे पाणी प्रदूषित होऊन पर्यावरणाला नुकसान होत आहे. या बाबीवर समितीने अभ्यास करून निर्णय घ्यावा असे मत आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी मानले.पर्यावरणाच्या उपाययोजनेबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या. समितीची बैठक प्रत्येक तिमाहीला घेण्यात यावी. असे त्यांनी सूचविले. मोठे उद्योग असलेल्या परिसरात प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याबाबत आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राईस मिल आणि उद्योग पर्यावरणाचे निकष पाळतात किंवा नाही याबाबतचा सविस्तर अहवाल समितीला सादर करण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सूचना दिल्या.