शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:49 IST

महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देचंद्रकांत वानखेडे : ग्रंथ जत्रेत गांधी जीवन व विचारावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी येथे केले.उच्च तंत्र व शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ जत्रा कार्यक्रमात ते ‘गांधी जीवन व विचार’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाच्या सहाय्यक ग्रंथपाल डॉ.पूजा दाढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, नागपूर येथील गांधी विचारवंत सुनील पाटील उपस्थित होते. चंद्रकांत वानखेडे यांनी गांधीजींच्या जीवनाचा आढावा घेत स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे महत्व विशद केले. ते म्हणाले, गांधीजींच्या आगमनानंतर स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य सहभागी झाले.आजही जगभरातील नेत्यांचे महात्मा गांधी आदर्श आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेलांनी गांधीजींच्या विचारावर क्रांती केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, मी गांधीमुळेच अमेरिकेचा अध्यक्ष झालो. गांधींजी महती संपूर्ण जगाला पटली. परंतु आपण खऱ्या अर्थाने गांधी समजूनच घेतला नाही. गांधींचे तत्वज्ञान भेकड तत्वज्ञान असल्याचे आपल्यावर बिंबवले गेले. परंतु शस्त्राची भाषा करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे १८५७ च्या उठावातून सिद्ध झाले होते. त्यामुळेच महात्मा गांधींनी सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून देश स्वातंत्र्य केला. असे ते म्हणाले.महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या प्रवाहात आणले. हे काही मुठभर लोकांना पटले नाही. त्यातूनच गांधींची हत्या झाल्याचे सांगत वानखेडे म्हणाले, गांधी कोणाच्या मारल्याने मरणार नाही. चांगुलपणाला जोपर्यंत मरण नाही तोपर्यंत गांधी मरणार नाही.सत्य, अहिंसा ही मूल्य आहेत तोपर्यंत गांधींचे विचार मरणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुनील पाटील व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. यावेळी ग्रंथपे्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या व्याख्यानानंतर ‘गुगल तो सहाय्यक है, पुस्तकही नायक है’ यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती.कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे गं्रंथपाल डॉ.दीपक कापडे, नागपुरच्या कला वाणिज्य नाईट कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.अशोक खोब्रागडे, समर्थ महाविद्यालय लाखनीचे ग्रंथपाल डॉ.धनंजय गभणे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनीचे ग्रंथपाल डॉ.संजय रायबोले यांनी यात सहभाग घेतला. यावेळी पुस्तक किती महत्वाचे आहे यावर मंथन करण्यात आले.