शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:49 IST

महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी येथे केले.

ठळक मुद्देचंद्रकांत वानखेडे : ग्रंथ जत्रेत गांधी जीवन व विचारावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी येथे केले.उच्च तंत्र व शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ जत्रा कार्यक्रमात ते ‘गांधी जीवन व विचार’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाच्या सहाय्यक ग्रंथपाल डॉ.पूजा दाढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, नागपूर येथील गांधी विचारवंत सुनील पाटील उपस्थित होते. चंद्रकांत वानखेडे यांनी गांधीजींच्या जीवनाचा आढावा घेत स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे महत्व विशद केले. ते म्हणाले, गांधीजींच्या आगमनानंतर स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य सहभागी झाले.आजही जगभरातील नेत्यांचे महात्मा गांधी आदर्श आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेलांनी गांधीजींच्या विचारावर क्रांती केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, मी गांधीमुळेच अमेरिकेचा अध्यक्ष झालो. गांधींजी महती संपूर्ण जगाला पटली. परंतु आपण खऱ्या अर्थाने गांधी समजूनच घेतला नाही. गांधींचे तत्वज्ञान भेकड तत्वज्ञान असल्याचे आपल्यावर बिंबवले गेले. परंतु शस्त्राची भाषा करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे १८५७ च्या उठावातून सिद्ध झाले होते. त्यामुळेच महात्मा गांधींनी सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून देश स्वातंत्र्य केला. असे ते म्हणाले.महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या प्रवाहात आणले. हे काही मुठभर लोकांना पटले नाही. त्यातूनच गांधींची हत्या झाल्याचे सांगत वानखेडे म्हणाले, गांधी कोणाच्या मारल्याने मरणार नाही. चांगुलपणाला जोपर्यंत मरण नाही तोपर्यंत गांधी मरणार नाही.सत्य, अहिंसा ही मूल्य आहेत तोपर्यंत गांधींचे विचार मरणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुनील पाटील व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. यावेळी ग्रंथपे्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या व्याख्यानानंतर ‘गुगल तो सहाय्यक है, पुस्तकही नायक है’ यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती.कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे गं्रंथपाल डॉ.दीपक कापडे, नागपुरच्या कला वाणिज्य नाईट कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.अशोक खोब्रागडे, समर्थ महाविद्यालय लाखनीचे ग्रंथपाल डॉ.धनंजय गभणे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनीचे ग्रंथपाल डॉ.संजय रायबोले यांनी यात सहभाग घेतला. यावेळी पुस्तक किती महत्वाचे आहे यावर मंथन करण्यात आले.