शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

कृषिपंपाची वीज खंडित करण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

सरपंचांचा आंदोलनाचा इशारा तुमसर : खरीप हंगामात वीज वितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यात ...

सरपंचांचा आंदोलनाचा इशारा

तुमसर : खरीप हंगामात वीज वितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष आहे धान उत्पादक तुमसर तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे त्यामुळे धानाची रोवणी खोळंबली आहे. २०२२ पर्यंत वीज बिल भरण्याची मुदत असताना वीज वितरण कंपनी सरसकट शेतकऱ्यांची वीज खंडित करीत आहे. त्यामुळे शहर परिसरातील विविध गावाच्या सरपंच यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तुमसर तालुका हा प्रमुख धान उत्पादक तालुका आहे. खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस बऱ्यापैकी पडला. परंतु मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धानाची रोवणी थांबली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत त्यांनी धानाची रोवणी सुरू केले होते. परंतु वीज वितरण कंपनीने कृषिपंपाची वीज खंडित करण्याचे सत्र सुरू ठेवले त्यामुळे शिवरा परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत.

२०२२ पर्यंत कृषिपंपाच्या वीज बिल भरण्याची मुदत देण्यात आली आहे. तरीसुद्धा वीज वितरण कंपनी सरसकट कृषिपंपाची वीज खंडित करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष पसरला आहे. वीज वितरण कंपनीने वीज खंडित करण्याचे सत्र बंद न केल्यास सिहोरा परिसरातील परसवाडाचे सरपंच राजू मेटे, मांडवीचे सरपंच सहादेव ढबाले, रेंगेपारचे बंटी नागपुरे, कर्कापुरचे प्रल्हाद आगाशे, वाहनीचे गडी राम बांडेबुचे, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.