शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लाखांदुरातील आठ पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST

लाखांदूर : गत काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे तालुक्यातील आठ पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित ...

लाखांदूर : गत काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे तालुक्यातील आठ पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित झाला आहे. या योजनेचा वीज खंडित झाल्याने गावकऱ्यांत पाणीपुरवठ्याअभावी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

गत वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून वीज बिल माफ होण्याचा अंदाज नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. या अंदाजानुसार तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याची देखील चर्चा आहे. यावेळी वीज बिल कंपनीद्वारा थकीत वीज बिल वसुली व वीज बिलाचा भरणा न करण्यावर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेंतर्गत गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील आठ ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे त्यांची वीज तोडण्यात आली आहे. तालुक्यातील मुर्झा, मानेगाव, धर्मापुरी, तई (बुज), खैरी, ढोलसर, भागडी व नांदेड आदी गावांतील पाणीपुरवठा योजनेची विद्युत खंडित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांद्वारा कराचा भरणा न केल्याने सदर वीज खंडितची समस्या उद्भवली असल्याची चर्चा केली जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

बॉक्स

बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर

वीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील आठ गावांतील पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आली. यामुळे सदर गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधित गावात पिण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर होत असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.