शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

पोलीस पंचनाम्यातून शिक्षकांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 00:37 IST

घडलेल्या गुन्ह्यात पोलीस प्रशासन शिक्षकांना पंच म्हणून बोलवित होते.

शासन परिपत्रक : शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरणभंडारा : घडलेल्या गुन्ह्यात पोलीस प्रशासन शिक्षकांना पंच म्हणून बोलवित होते. मात्र शिक्षकांना यानंतर कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीत पंच म्हणून बोलवू नये असे अध्यादेश शासनाने निर्गमित केले आहे. स्थानिक स्वराज संस्था अंतर्गत शिक्षक हे निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोडतात तर खासगी शाळांमध्ये शिक्षक हे त्या त्या व्यवस्थापनांतर्गत खाजगी कर्मचारी म्हणून गणण्यात येतात. असे असतांनाही ग्रामीण किंवा शहरी भागात एखादा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा झाल्यास पंचनाम्यासाठी साक्षीदार म्हणून शिक्षकांऐवजी शासकीय कर्मचाऱ्यांना घ्यावे असे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यात शिक्षकांची साक्ष घेवून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार पोलीस प्रशासनाकडून अवलंबिण्यात येत असल्याने शासनाकडे रोष व्यक्त केला होता. फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यातून शिक्षकांची सुटका करावी अशी मागणी या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु शासनाने याबाबत निर्णय नव्हता. तर शिक्षण विभागाने शिक्षकांनी फौजदारी गुन्ह्यात पंच म्हणून उपस्थित राहावे की नाही याबाबत स्पष्ट भुमिका घेतली होती. त्यामुळे शिक्षकांना पंच म्हणून उपस्थित राहण्याचा तगादा पोलीस प्रशासनाने लावला होता. याबाबत शिक्षकांमध्ये असंतोष होता. याबाबत गृह विभागाचे कार्यासन अधिकारी अ.व्ही. जोशी यांनी अध्यादेश काढला असून फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यात शिक्षकांना पंच म्हणून बोलवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहे. यामुळे शिक्षकांच्या चेहऱ्यावर आता समाधान झळकु लागले आहे. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ती योग्य रित्या पार पाडण्यासाठी शिक्षक प्रतिबध्द आहे. शासनाने शिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही कार्याची जबाबदारी शिक्षकांवर लादू नये. गृह विभागाच्या या अध्यादेशामुळे शिक्षकांना समाधान मिळाले आहे.- मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महा. राज्य प्राथ. शिक्षक संघ, भंडारा