शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

पर्यटनाकरिता नियोजनाची गरज

By admin | Updated: September 27, 2015 00:32 IST

पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.

आज पर्यटन दिन : पवनीत संधीपवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता पर्यटनात आहे. पण पर्यटनाचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन करण्यात येत नसल्यामुळे पर्यटनाचा विकास झालेला नाही. पर्यटन क्षेत्र विकसित करण्याकरिता एक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.तालुक्यात विदर्भातील सर्वात मोठे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पत्ता मेत्ता संघ द्वारा निर्मित आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधी महास्तुप, शहरातील प्राचीन, ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभेस्वामी मंदिर, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटनस्थळांसोबत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी वन्यजीव वनक्षेत्र आदींचा समावेश आहे.मागील तीन चार वर्षापासून पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पवनी शहराचा पर्यटन शहराच्या रुपात विकास होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. पर्यटन वाढेल त्यामुळे रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शहराचे गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे.ऐतिहासिक पवनी शहराची जनता ही शहरामध्ये पर्यटन वाढण्याच्या बाजूने आहे. येथील जनतेच्या भावना पर्यटनस्थळाच्या विकासाशी जुळलेल्या आहेत. मागील चार वर्षापासून शासनातर्फे पर्यटन विकासाचा कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही. ऐतिहासिक किल्ल्याखालील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे तयार होत असलेले पर्यटन संकुल आठ दहा वर्षे झाले तरी अजून तयार झाले नाही. येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाच्या पर्यटनस्थळाच्या यादीत आणणे, पर्यटनस्थळांना शासन स्तरावर प्रसिद्धी देणे, पर्यटनस्थळाचा विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी विषयावर विचार करून एक पर्यटन विकास आराखडा तयार करून शासनस्तरावर नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास होण्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)