शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाकरिता नियोजनाची गरज

By admin | Updated: September 27, 2015 00:32 IST

पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत.

आज पर्यटन दिन : पवनीत संधीपवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता पर्यटनात आहे. पण पर्यटनाचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन करण्यात येत नसल्यामुळे पर्यटनाचा विकास झालेला नाही. पर्यटन क्षेत्र विकसित करण्याकरिता एक ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.तालुक्यात विदर्भातील सर्वात मोठे महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण, रुयाड येथील पत्ता मेत्ता संघ द्वारा निर्मित आंतरराष्ट्रीय स्तराचा महासमाधी महास्तुप, शहरातील प्राचीन, ऐतिहासिक किल्ला, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, टेंभेस्वामी मंदिर, वैजेश्वर मंदिर आदी पर्यटनस्थळांसोबत उमरेड कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी वन्यजीव वनक्षेत्र आदींचा समावेश आहे.मागील तीन चार वर्षापासून पर्यटनक्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पवनी शहराचा पर्यटन शहराच्या रुपात विकास होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. या शहराचा रामटेकच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास पूर्ण तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल. पर्यटन वाढेल त्यामुळे रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शहराचे गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याची गरज आहे.ऐतिहासिक पवनी शहराची जनता ही शहरामध्ये पर्यटन वाढण्याच्या बाजूने आहे. येथील जनतेच्या भावना पर्यटनस्थळाच्या विकासाशी जुळलेल्या आहेत. मागील चार वर्षापासून शासनातर्फे पर्यटन विकासाचा कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही. ऐतिहासिक किल्ल्याखालील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे तयार होत असलेले पर्यटन संकुल आठ दहा वर्षे झाले तरी अजून तयार झाले नाही. येथील पर्यटन स्थळाला शासनाच्या महत्वाच्या पर्यटनस्थळाच्या यादीत आणणे, पर्यटनस्थळांना शासन स्तरावर प्रसिद्धी देणे, पर्यटनस्थळाचा विकास करणे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे आदी विषयावर विचार करून एक पर्यटन विकास आराखडा तयार करून शासनस्तरावर नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनाचा विकास होण्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)