शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील खड्डे बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST

मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या तुमसर बपेरा राज्य मार्गाची अवस्था जीवघेणी झाली आहे. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...

मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या तुमसर बपेरा राज्य मार्गाची अवस्था जीवघेणी झाली आहे. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. २८ किमी लांब असणाऱ्या या राज्य मार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. राज्य मार्गाचे कडेला असणारी झुडपे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. बिनाखी ते बपेरा या गावापर्यंत राज्य मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत.

राज्य मार्गावर खिंड पडली असल्याने वेगान धावणारी वाहने आदळत आहेत. वाहनाचे एक चाक खड्ड्यातून निघताच दुसरे चाक खड्यातच राहत आहे. यामुळे खड्डे वाचवताना कमालीची कसरत करावी लागत आहे.

प्रवास करताना वाहन धारकांचे नाकी नऊ येत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नाही. यामुळे नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या राज्य मार्गावर खोल खड्डे पडले आहेत. राज्य मार्ग दुरुस्तीची ओरड सुरू झाली आहे.

मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे यंत्रणेने राज्य मार्गाचे अवलोकन केले आहे. परंतु खड्डे बुजविण्याचे कामांना सुरुवात करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा गांधारीच्या भूमिकेत राहत आहे.

राज्य मार्गाचे नूतनीकरणाकरीता निविदा काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतू निविदा धारकाने कामांना सुरुवात केली नाही. राज्य मार्ग दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने त्रास होत आहे. राज्य मार्गवरून नाकडोंगरी राज्य मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर दोन पदरी राज्य मार्गावरून चार पदरीची वाहतूक सुरु आहे. या राज्य मार्गावर ब्रेकर नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे आणखी कुणाचा बळी जाईल सांगता येत नाही. जनतेच्या सुरक्षतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका पोलिसाने वाहन धारकांविषयी दया दाखवत मुरुमाचे गतिरोधक तयार करणार असल्याची माहिती दिली आहे.

बॉक्स

चुल्हाड ते सुकली नकुल मार्गाची स्थिती ठीक नाही. एक कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले आहे. महिनाभरात डांबरीकरण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याचे लक्ष वेधले होते. निकृष्ट बांधकामाचे आरोप गावकऱ्यांनी केले आहेत. कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रणा यानंतर खडबडून जागी झाली. खड्ड्यात पँचेस लावण्यात आले. परंतु या मार्गाचे दुर्दैवच म्हणावे लागेल, पँचेसही उखडण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. पाच वर्षापर्यंत देखभाल आणि दुरुस्तीसाठी करारबद्ध असले तरी ठिगळ असणाऱ्या रस्त्यावरूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामात कंपन्या नापास झालेल्या आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी तालुका उपाध्यक्ष विनोद पटले यांनी केली आहे.