शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धांचे अर्थशास्त्र

By admin | Updated: April 14, 2016 00:46 IST

महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत.

श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन : ‘भारत गणराज्याचे विधिवत नामकरण’ ग्रंथाचे प्रकाशनभंडारा : महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत. सत्यशोधकी पत्रकारीतेचा पाया सुद्धा फुले-आंबेडकरांनी घातला. डॉ. आंबेडकर हे घटनात्मक नैतीकतेचे नाव आहे. ते धम्माला घटनेच्या नैतीकतेचे अधिष्टान देऊ इच्छित होते. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरीता फुले-आंबेडकर अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे. कारण फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धाचे अर्थशास्त्र सांगते, असे रोखठोक विचार प्रसिद्ध कवी व साहित्यचिंतक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे ११ एप्रिल रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित आजचे समाजवास्तव आणि फुले-आंबेडकरी विचार या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, महेंद्र गडकरी, अश्ववीर गजभिये, अमृत बन्सोड व निशांत राऊत होते. ते म्हणाले की, फुले-आंबेडकरी विचाराविरूद्ध सुरू असलेली प्रतीक्रांती हे आजचे समाजवास्तव आहे. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेती नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी न होणे, रोहित वेमुला आणि कन्हैय्याकुमार यांच्यावर सूडबुद्धीने कार्यवाही करणे, पुरोगामी दाभोळकर-पाणसरे-कलबुर्गी यांची हत्या करून फुले-आंबेडकरी विचार संपविण्याचा प्रयत्न करणे, विकासाच्या नावाखाली विनाशाचा दहशतवाद पसरविणे या सर्व घटना आजचे समाजवास्तव आहे. याप्रसंगी भारत गणराज्याचे विधिवत नामकरण या प्रा. अश्ववीर गजभिये लिखित ग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, युनोमध्ये सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. म्हणजे ते विश्वमानव होते याचे प्रतीक आहे. आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत. ते परीपूर्ण मानव होते म्हणून त्यांचे निव्वळ व्यक्तीपूजक होण्यापेक्षा त्यांचे विचाराचे पुजक व्हायला पाहिजे. तसेच त्यांचे आर्थिक विचार अंगीकारून आर्थिक प्रगती आपण साधली पाहिजे. डॉ. अनिल नितनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर पाश्चिमात्य विचारवंत व तत्ववेते यांचा प्रभाव पडला असल्याचा उहापोह करून डॉ. आंबेडकर केवळ एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे, असे सांगितले. व्याख्यानाचे संचालन व प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी, आभार असित बागडे यांनी तर संयोजन गुलशन गजभिये यांनी केले. व्याख्यानाकरीता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समितीचे अध्यक्ष निशांत राऊत, सचिव अजय तांबे, महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, डॉ. रविंद्र वानखेडे, गुलशन गजभिये, प्रभाकर भोयर, डी.एफ. कोचे, संजय बन्सोड, अजय गडकरी, सुनित नगराळे, हरिश्चंद्र दहिवले, अमित उके, प्रशांत बागडे, प्रशांत सूर्यवंशी, संदेश शेेंडे, रूपचंद रामटेके, करण रामटेके, किशोर मेश्राम, शरद खोब्रागडे, शैलेश मेश्राम, मोनू गोस्वामी, अरुण अंबादे, नितीन मेश्राम, दिनेश गोस्वामी आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)