शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धांचे अर्थशास्त्र

By admin | Updated: April 14, 2016 00:46 IST

महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत.

श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन : ‘भारत गणराज्याचे विधिवत नामकरण’ ग्रंथाचे प्रकाशनभंडारा : महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर तर पाया महात्मा फुले होत. सत्यशोधकी पत्रकारीतेचा पाया सुद्धा फुले-आंबेडकरांनी घातला. डॉ. आंबेडकर हे घटनात्मक नैतीकतेचे नाव आहे. ते धम्माला घटनेच्या नैतीकतेचे अधिष्टान देऊ इच्छित होते. भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरीता फुले-आंबेडकर अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे. कारण फुले-आंबेडकरी अर्थव्यवस्था बुद्धाचे अर्थशास्त्र सांगते, असे रोखठोक विचार प्रसिद्ध कवी व साहित्यचिंतक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे ११ एप्रिल रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित आजचे समाजवास्तव आणि फुले-आंबेडकरी विचार या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, महेंद्र गडकरी, अश्ववीर गजभिये, अमृत बन्सोड व निशांत राऊत होते. ते म्हणाले की, फुले-आंबेडकरी विचाराविरूद्ध सुरू असलेली प्रतीक्रांती हे आजचे समाजवास्तव आहे. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेती नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी न होणे, रोहित वेमुला आणि कन्हैय्याकुमार यांच्यावर सूडबुद्धीने कार्यवाही करणे, पुरोगामी दाभोळकर-पाणसरे-कलबुर्गी यांची हत्या करून फुले-आंबेडकरी विचार संपविण्याचा प्रयत्न करणे, विकासाच्या नावाखाली विनाशाचा दहशतवाद पसरविणे या सर्व घटना आजचे समाजवास्तव आहे. याप्रसंगी भारत गणराज्याचे विधिवत नामकरण या प्रा. अश्ववीर गजभिये लिखित ग्रंथाचे प्रकाशन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, युनोमध्ये सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. म्हणजे ते विश्वमानव होते याचे प्रतीक आहे. आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत. ते परीपूर्ण मानव होते म्हणून त्यांचे निव्वळ व्यक्तीपूजक होण्यापेक्षा त्यांचे विचाराचे पुजक व्हायला पाहिजे. तसेच त्यांचे आर्थिक विचार अंगीकारून आर्थिक प्रगती आपण साधली पाहिजे. डॉ. अनिल नितनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर पाश्चिमात्य विचारवंत व तत्ववेते यांचा प्रभाव पडला असल्याचा उहापोह करून डॉ. आंबेडकर केवळ एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे, असे सांगितले. व्याख्यानाचे संचालन व प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी, आभार असित बागडे यांनी तर संयोजन गुलशन गजभिये यांनी केले. व्याख्यानाकरीता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता समितीचे अध्यक्ष निशांत राऊत, सचिव अजय तांबे, महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, डॉ. रविंद्र वानखेडे, गुलशन गजभिये, प्रभाकर भोयर, डी.एफ. कोचे, संजय बन्सोड, अजय गडकरी, सुनित नगराळे, हरिश्चंद्र दहिवले, अमित उके, प्रशांत बागडे, प्रशांत सूर्यवंशी, संदेश शेेंडे, रूपचंद रामटेके, करण रामटेके, किशोर मेश्राम, शरद खोब्रागडे, शैलेश मेश्राम, मोनू गोस्वामी, अरुण अंबादे, नितीन मेश्राम, दिनेश गोस्वामी आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)