शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

दंड भरू, पण बाहेर फिरू ; विनाकारण फिरणारेच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : कोरोना महामारीला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन अंतर्गत मोहीम राबवली जात आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : कोरोना महामारीला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन अंतर्गत मोहीम राबवली जात आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. मात्र अशा स्थितीतही शेकडो नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी भंडारा पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. मात्र आम्ही ‘दंड भरू पण बाहेर फिरू’ अशी उदाहरणे समोर येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेअंतर्गत आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने ९८० जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लक्ष ७८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे बाहेर फिरणारे आतापर्यंत १६० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याची बाब समोर आली आहे. मात्र आम्ही तपासणीला जात आहोत, दवाखान्यातून आलो आहोत, अशी कारणे दाखवून वेळ मारून नेली जात आहे. नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाने रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. या कारवाईला झुगारून नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

शहरातील २७ ठिकाणी निगराणी ठेवण्यात आली असून आतापर्यंत १०१ ठिकाणी भेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील २० उपहारगृह, तीन जिम तसेच ४५ सार्वजनिक स्थळी कारवाई करीत एकूण ९८० व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

बॉक्स

शहरात २७ ठिकाणी तपासणी

विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यामुळे प्रशासनाने तपासणीची संख्या वाढविली होती. शहरातील २७ ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या भरारी पथकाने व्यक्तींची कोरोना तपासणी केली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुका मुख्यालयी अशीच स्थिती पहावयास मिळत आहे. मात्र नागरिकच नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. गत दहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असताना नागरिकांचा हलगर्जीपणा अंगलट येऊ शकतो. सध्यातरी ‘नागरिकहो असे का वागता’ असे म्हणण्याची पुन्हा वेळ आली आहे.

तपासणीत कारणे मात्र तीच

शहरातील मुख्य चौकांमध्ये महसूल तथा पोलीस विभागाची पथके तैनात आहेत एखाद्या नागरिकाला अडविल्यास दवाखान्यात किंवा बँकेत किंवा अन्य महत्त्वाच्या कामाला जात असल्याचे सांगण्यात येते मात्र शहानिशा केल्यावर ती व्यक्ती शुल्लक कारणासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे.

याबाबत नागरिकांनीच पुढाकार घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे, यात शंका नाही.