शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पवनीचे मुख्य बसस्थानक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

अशोक पारधी लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : राज्य परिवहन महामंडळाच्या पवनी बसस्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विद्युतची पुरेशी सोय नाही. ...

अशोक पारधी

लोकमत न्यूज नेटवर्क

पवनी : राज्य परिवहन महामंडळाच्या पवनी बसस्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने विद्युतची पुरेशी सोय नाही. त्यामुळे संध्याकाळपासून मुख्य बसस्थानक अंधारमय झालेले असते.

नागपूर रोडवर असलेले बसस्थानक व बसआगार पूर्वी पवनी नगरापासून खूप अंतरावर होते, पण गेल्या दहा वर्षांत शिवाजीनगर, शेषनगर, न्यू शेषनगर अशा नवीन वसाहती बसस्थानकासमोर तयार झाल्या. त्यामुळे बसस्थानक गावापासून दूर राहिलेले नाही. बसस्थानकाचा एवढा मोठा परिसर अंधारमय राहिला, तर असामाजिक तत्त्वे एकांतवासाचा गैरफायदा घेतील व अनैसर्गिक घटना घडल्यानंतर परिसरात विद्युत दिवे लावले जातील.

त्यापेक्षा खबरदारीचा उपाय म्हणून बसस्थानक, बसआगार व परिसरात विद्युत दिवे लावले जावे. गोसीखुर्दचा उजवा कालवा व त्यालगत शेती व जंगल असल्याने अंधाराचा फायदा घेऊन वन्यजीवांचे वास्तव्य परिसरात वाढू शकते. गावालगत धोका टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाने, विधानसभा सदस्यांनी जातीने लक्ष केंद्रित करून बसस्थानक, बसआगार परिसरात विद्युत दिवे लावण्यासाठी निधीची तरतूद करावी व परिसरातील अंधार दूर करावा, अशी मागणी आहे.

200921\img-20210915-wa0023.jpg

पवनी चे मुख्य बस स्थानक व बस आगारात एकच विद्युत दिवा.