शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पवनीच्या युवकाने दिला परप्रांतियांना रोजगार

By admin | Updated: March 23, 2016 00:46 IST

होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी : गाठ्या निर्मितीला वेग, १५ वर्षांपासून व्यवसाय सुरू पवनी : होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. या वर्षी साखर महाग झाल्यामुळे गाठयाही महाग होणार आहेत. या वर्षी ८ ते १० टक्क्याने गाठ्या महागणार आहेत.होळी व धूलिवंदन सणानिमित्त नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मित गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु आहे. ती आजही सुरु आहे. शहरातील घोडेघाट वार्डातील रवींद्र शिवरकर हे मागील १४ वर्षापासून गाठया निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांचे संपूर्ण कुटुंब मदत करतात.गाठ्या निर्मितीकरिता मोठया पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठया भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घालून विवीध प्रकारच्या गाठयांची निमिर्ती केली जाते. या गाठया निर्मिती करण्याकरिता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते. या कारागीरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची जेवणाची व्यवस्था केली जाते. या कारागिरांना एक क्विंटल मागे ४०० रुपये मजूरी दिली जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठयांची निर्मीती केली जाते. याचे त्यांना ८०० रुपये मिळतात. एक क्विंटल साखरेच्या ९५ किलो गाठयांची निर्मीती होते. या गाठया २५, ५०, १००, २००, ५०० व १०० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.रविंद्र शिवरकर यांनी २३ फेब्रुवारी गाठया निर्मीती सुरु केली आहे. या वर्षी जवळपास ७२ क्विंटल गाठ्यांची निर्मीती होण्याची अपेक्षा आहे. या गाठया भंडारा, लाखनी, भिवापूर, वडसा, उमरेड, ब्रम्हपूरी आदी शहरात पोहोचल्या आहेत. या व्यवसायात १० महिलांनाही रोजगार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)