शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पवनीच्या युवकाने दिला परप्रांतियांना रोजगार

By admin | Updated: March 23, 2016 00:46 IST

होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी : गाठ्या निर्मितीला वेग, १५ वर्षांपासून व्यवसाय सुरू पवनी : होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. या वर्षी साखर महाग झाल्यामुळे गाठयाही महाग होणार आहेत. या वर्षी ८ ते १० टक्क्याने गाठ्या महागणार आहेत.होळी व धूलिवंदन सणानिमित्त नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मित गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु आहे. ती आजही सुरु आहे. शहरातील घोडेघाट वार्डातील रवींद्र शिवरकर हे मागील १४ वर्षापासून गाठया निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांचे संपूर्ण कुटुंब मदत करतात.गाठ्या निर्मितीकरिता मोठया पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठया भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घालून विवीध प्रकारच्या गाठयांची निमिर्ती केली जाते. या गाठया निर्मिती करण्याकरिता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते. या कारागीरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची जेवणाची व्यवस्था केली जाते. या कारागिरांना एक क्विंटल मागे ४०० रुपये मजूरी दिली जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठयांची निर्मीती केली जाते. याचे त्यांना ८०० रुपये मिळतात. एक क्विंटल साखरेच्या ९५ किलो गाठयांची निर्मीती होते. या गाठया २५, ५०, १००, २००, ५०० व १०० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.रविंद्र शिवरकर यांनी २३ फेब्रुवारी गाठया निर्मीती सुरु केली आहे. या वर्षी जवळपास ७२ क्विंटल गाठ्यांची निर्मीती होण्याची अपेक्षा आहे. या गाठया भंडारा, लाखनी, भिवापूर, वडसा, उमरेड, ब्रम्हपूरी आदी शहरात पोहोचल्या आहेत. या व्यवसायात १० महिलांनाही रोजगार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)