शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

वेळेत दुकान बंद करण्यासाठी पाेलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

वरठी : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी अनेक निर्बंध घालून दिले असून सर्व दुकाने दुपारी ४ वाजता बंद करावे लागतात. शहरी ...

वरठी : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी अनेक निर्बंध घालून दिले असून सर्व दुकाने दुपारी ४ वाजता बंद करावे लागतात. शहरी भागासह ग्रामीण भागात वेळेवर दुकाने बंद करण्यासाठी पाेलिसांना दरराेज बाजारपेठेत फेरफटका मारावा लागताे. अनेकदा व्यापाऱ्यांसाेबत हुज्जतही हाेते. दाेन वर्षांपासून व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्यात चांगलाच राेष दिसताे. त्यामुळे वेळेत दुकान बंद करण्यासाठी पाेलिसांची माेठी दमछाक हाेते. दंडात्मक कारवाई करूनही दुकाने अनेकदा उशिरापर्यंत सुरू असतात. त्यातच नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागते.

कोरोनाच्या संकटातून अद्याप सुटका झाली नाही. त्यामुळे पहिल्या लेव्हलमधून जिल्हा तिसऱ्या लेव्हलमध्ये आला. शिथिल झालेले नियम पुन्हा लागू करण्यात आले. नवीन नियमानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ व शनिवार व रविवार पूर्णतः व्यापार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठान ठरावीक वेळेवर बंद करावे लागतात. या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलिसांची दमछाक होताना दिसते. कायदा व सुव्यवस्था राखत नियमाचे काटेकोरपणे पालन करवून घेण्यात घाम फुटत आहे. पोलिसांची गाडी दिसताच दुकानदारांची होणाऱ्या धावपळीने स्थिरता घेतली आहे. मुकाट्याने बंद होणारी दुकाने आता हुज्जत घालत असून दुकान बंद करण्यास मज्जाव करताना दिसतात. जबरदस्तीने दुकाने बंद झाली तरी रस्त्यावरील जत्थे कमी होताना दिसत नाहीत. दरम्यान, पोलीस व सरकार प्रति रोष व्यक्त होताना दिसते. कोरोनाच्या दीर्घ प्रतीक्षेत नागरिकांचा संयम हळूहळू डगमगताना दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स

व्यापाराची गती मंदावली

निर्बंधासह बाजारपेठ उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र, उद्योग, व्यवसायाची गती मंदावली आहे. दिवसभर दुकानात बसूनही गिऱ्हाईक फिरकत नसल्याचे दुकानदार सांगतात. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडल्यास उर्वरित सर्व व्यवसायाला कासवगती असल्याने दुकानदारात असंतोष आहे. असाच प्रतिसाद राहिल्यास चरितार्थ कशा चालवावा, असा त्यांचा सवाल आहे.

बाॅक्स

सर्वांना सारखा नियम लावा

निर्बंध पाळण्यास नागरिकांचा विरोध नाही, पण पोलिसांकडून होणाऱ्या दुजाभावला नागरिकांनी नापसंती दर्शविलेली आहे. नियमाची कुऱ्हाड काही ठरावीक दुकानांना लागू असून मोठे व्यावसायिक व मर्जीतील दुकानांना यातून सूट देण्यात येत आहे. गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. त्यांना वेळेचे बंधन नाही. त्यामुळे सर्वांना समान नियम लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.