शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्र सुरु होताच पडले बंद

By admin | Updated: November 30, 2015 00:44 IST

आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने गोदामही भरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ संचालकावर आली आहे.

अपुऱ्या बारदाण्याचा शेतकऱ्यांना फटका : तीन दिवसातच गोदाम झाले फुल्लतुमसर : आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने गोदामही भरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ संचालकावर आली आहे. दुसरीकडे ज्या गोदामामध्ये जागा शिल्लक असतानाही आधारभूत केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कुठे अपुरा तर कुठे सडलेला बारदाणा पाठविला. त्यामुळे धान खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे धान आणू नये, अशा आशयाचा फलक केंद्राच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांची धान विक्रीकरिता परवड होत आहे.तुमसर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची मळणी झाली आहे. आधारभूत केंद्र दिवाळी पुर्वी सुरु होणार अशी आशा होती. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने दिवाळी सारखा सण डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांना काहीसा धान खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला होता. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा थांबवी आणि आधारभूत केंद्र सुरु करण्याची मागणी झाली. दरम्यान, दिवाळीनंतर आधारभुत केंद्रावर बारदाणा पडला व खरेदी सुरु होताच हमीभाव केंद्रावर अक्षरश: धानाची आवक वाढली. त्यामुळे आधारभूत केंद्र संचालकानी शेतकऱ्यांचे धान घेऊन त्यांना टोकन देण्यात आले. परंतु टोकण दिलेल्या धानाची मोजणी व्हायची असल्यानेही हमीभाव केंद्रावर धान अस्ताव्यस्त पडून पडलेला दिसत आहे. परिणामी धान केंद्रावर येणाऱ्या नविन शेतकऱ्यांच्या धानासाठी जागाच शिल्लक नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरातील नाकाडोंगरी येथिल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या आधारभूत केंद्रावरील गोदाम फुल्ल झाले असून शेतकऱ्यांना टोकन मिळालेला धान अजूनही गोदामाबाहेर असून नाकाडोंगरी, हिरापूर, राजापूर, गुढरी, खंडाळ, धामनेवाडा, चिखला, सिरपूर, हमेशा, हिरापूर व सोदेपूर आदी ठिकाणावरून मिळेल त्या साधनाने आधारभूत केंद्रावर धान विक्रीकरिता आणतच आहेत. आधारभूत केंद्राच्या संचालकाने गोदामाच्या दर्शनी भागात शेतकऱ्यांचा सूचना लिहून यापुढे धान विक्रीकरिता हमीभाव केंद्रावर आणू नये असे गोडावूनच्या दर्शनी भागात लिहून खरेदी बंद केली आहे. तर कुठे हमीभाव केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अपुरा बारदाणा तर कुठे सडका बारदाणा पाठविल्याने ते ही आधारभूत केंद्र बंदच असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान विकावे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)