शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धान खरेदी केंद्र सुरु होताच पडले बंद

By admin | Updated: November 30, 2015 00:44 IST

आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने गोदामही भरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ संचालकावर आली आहे.

अपुऱ्या बारदाण्याचा शेतकऱ्यांना फटका : तीन दिवसातच गोदाम झाले फुल्लतुमसर : आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने गोदामही भरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ संचालकावर आली आहे. दुसरीकडे ज्या गोदामामध्ये जागा शिल्लक असतानाही आधारभूत केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कुठे अपुरा तर कुठे सडलेला बारदाणा पाठविला. त्यामुळे धान खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे धान आणू नये, अशा आशयाचा फलक केंद्राच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांची धान विक्रीकरिता परवड होत आहे.तुमसर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची मळणी झाली आहे. आधारभूत केंद्र दिवाळी पुर्वी सुरु होणार अशी आशा होती. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने दिवाळी सारखा सण डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांना काहीसा धान खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला होता. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा थांबवी आणि आधारभूत केंद्र सुरु करण्याची मागणी झाली. दरम्यान, दिवाळीनंतर आधारभुत केंद्रावर बारदाणा पडला व खरेदी सुरु होताच हमीभाव केंद्रावर अक्षरश: धानाची आवक वाढली. त्यामुळे आधारभूत केंद्र संचालकानी शेतकऱ्यांचे धान घेऊन त्यांना टोकन देण्यात आले. परंतु टोकण दिलेल्या धानाची मोजणी व्हायची असल्यानेही हमीभाव केंद्रावर धान अस्ताव्यस्त पडून पडलेला दिसत आहे. परिणामी धान केंद्रावर येणाऱ्या नविन शेतकऱ्यांच्या धानासाठी जागाच शिल्लक नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरातील नाकाडोंगरी येथिल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या आधारभूत केंद्रावरील गोदाम फुल्ल झाले असून शेतकऱ्यांना टोकन मिळालेला धान अजूनही गोदामाबाहेर असून नाकाडोंगरी, हिरापूर, राजापूर, गुढरी, खंडाळ, धामनेवाडा, चिखला, सिरपूर, हमेशा, हिरापूर व सोदेपूर आदी ठिकाणावरून मिळेल त्या साधनाने आधारभूत केंद्रावर धान विक्रीकरिता आणतच आहेत. आधारभूत केंद्राच्या संचालकाने गोदामाच्या दर्शनी भागात शेतकऱ्यांचा सूचना लिहून यापुढे धान विक्रीकरिता हमीभाव केंद्रावर आणू नये असे गोडावूनच्या दर्शनी भागात लिहून खरेदी बंद केली आहे. तर कुठे हमीभाव केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अपुरा बारदाणा तर कुठे सडका बारदाणा पाठविल्याने ते ही आधारभूत केंद्र बंदच असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान विकावे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)