शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

धान उत्पादक जगताहेत अधांतरी

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़

धान खरेदी केंद्राचा अभाव : भाव मिळण्यासाठी शासन दरबारी नेतृत्वाची गरजसाकोली: संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये राबणारा शेतकरी आजघडीला चिंतायुक्त वातावरणात हलाखीचे जीवन जगत आहे़ बळीराजाने उत्पादन केलेल्या धानाला पुरेसाभाव मिळण्यासाठी सरकारशी भांडणाऱ्या लोकनेत्यांचा अभाव दिसत असल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे़ धान उत्पादकांचा खंबीर वालीच नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला दिसत आहे़ धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून, धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी शासन दरबारी भांडणाऱ्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे़ भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांकडून सहानुभूमी मिळवून राजकीय यशोशिखर गाठणारे महाभाग बरेच आहेत़ राज्यातील कापूस, ऊस व इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सवलती मिळवून देण्यासाठी तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून शासन दरबारी एकत्र भांडणारे लोकप्रतिनिधी राज्यातील काही भागात असल्याने आज कापसाला व इतर पिकाला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़ तो प्रकार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसून येत नाही़ गावातील सभामंचावरून शेतकऱ्यांप्रती आत्मीयता दाखविणाऱ्या दमदार लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी धान उत्पादकांच्या व्यथा मांडून त्या दुर सारण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे़ धान उत्पादकांना शेतामधून धानाचे पिक घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते़ त्यातल्या त्यात खताच्या वाढलेल्या किमती तसेच किटकनाशक,वाढलेली मजुरी, बियाणांचे वाढीव भाव, आणि त्यामानाने उत्पादीत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे़ अल्प प्रमाणात सबसीडीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार अनेकदा केला जातो़ तसेच निसर्गाच्या अवकृपेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे़ (तालुका प्रतिनिधी)