शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

धान उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:13 IST

सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे रब्बी पिकांचा पेराही कमी होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.मागील पावसाळ्यात आॅगस्टनंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शक्य तिथून पाणी मिळवून पिकाचे सिंचन करावे लागते. साकोली तालुक्यातील निम्न चुलबंद व भीमलकसा प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर किंवा शेतातील विहीर व बोरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटले आहे. संध्या हलक्या धानाची कापणी व चुरणे झाले आहे. शेतकरी हमीभाव धान खरेदी केंद्रात धानाची विक्री करीत होते. तालुक्यात जवळपास ३५ ते ४० हजार क्वींटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी काही शेतकºयांना धानाचे चुकारे मिळाले असून बरेच शेतकºयांना चुकारे मिळालेच नाही.भारी धानाच्या कापणीला आता सुरवात झाली आहे. मात्र शेवटी शेवटी पावसाच्या कमतरतेमुळे भारी धानाच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील तीन वर्षापासून सतत दुष्काळीसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे जमापंूजी शिल्लक नाही. अशावेळी दिवाळीला मुलांना कपडे खरेदी करण्यास शेतकरी असमर्थ ठरला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खाजगी उसनवार केल्याचे बरीच उदाहरणे समोर आली आहेत.वाढता कर्जबाजारीपणामागील तीन वर्षापासून बदलते पर्जन्यमान, किड रोगाचा प्रादूर्भाव यामुळे उत्पादन घटले आहे. मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी बीबीयाने, खते, रोवणी, तांदळाचा दर वाढण्याऐवजी कमी होत आहे. त्यामुळे बाजारात तांदळाची आवक मंदावली आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी यामुळे शेतकऱ्यावर दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढतच आहे.विम्याचा उपयोग कायशेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण देण्यासाठी कर्जाच्या रकमेतून विमा हप्त्याची कपात केली जाते. परंतु नैसर्गी आपत्ती, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकºयांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विम्याचा शेतकºयांना उपयोग काय असा प्रश्न आहे.