शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

धान उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:13 IST

सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे रब्बी पिकांचा पेराही कमी होण्याची भिती वर्तविण्यात येत आहे.मागील पावसाळ्यात आॅगस्टनंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शक्य तिथून पाणी मिळवून पिकाचे सिंचन करावे लागते. साकोली तालुक्यातील निम्न चुलबंद व भीमलकसा प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गावर किंवा शेतातील विहीर व बोरवेलच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.त्यामुळे यावर्षीही उत्पादन घटले आहे. संध्या हलक्या धानाची कापणी व चुरणे झाले आहे. शेतकरी हमीभाव धान खरेदी केंद्रात धानाची विक्री करीत होते. तालुक्यात जवळपास ३५ ते ४० हजार क्वींटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी काही शेतकºयांना धानाचे चुकारे मिळाले असून बरेच शेतकºयांना चुकारे मिळालेच नाही.भारी धानाच्या कापणीला आता सुरवात झाली आहे. मात्र शेवटी शेवटी पावसाच्या कमतरतेमुळे भारी धानाच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील तीन वर्षापासून सतत दुष्काळीसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याकडे जमापंूजी शिल्लक नाही. अशावेळी दिवाळीला मुलांना कपडे खरेदी करण्यास शेतकरी असमर्थ ठरला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खाजगी उसनवार केल्याचे बरीच उदाहरणे समोर आली आहेत.वाढता कर्जबाजारीपणामागील तीन वर्षापासून बदलते पर्जन्यमान, किड रोगाचा प्रादूर्भाव यामुळे उत्पादन घटले आहे. मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी बीबीयाने, खते, रोवणी, तांदळाचा दर वाढण्याऐवजी कमी होत आहे. त्यामुळे बाजारात तांदळाची आवक मंदावली आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी यामुळे शेतकऱ्यावर दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढतच आहे.विम्याचा उपयोग कायशेतकऱ्यांच्या पिकाला विमा संरक्षण देण्यासाठी कर्जाच्या रकमेतून विमा हप्त्याची कपात केली जाते. परंतु नैसर्गी आपत्ती, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान होऊनही अनेक शेतकºयांना विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे विम्याचा शेतकºयांना उपयोग काय असा प्रश्न आहे.