शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धान उत्पादक धडकले जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:54 IST

'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे४८ दिवसानंतरही चुकारे नाही : अधिकाऱ्यांनी केले हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : 'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.पालांदूर परिसरात पावसाने सुरूवात केली असल्याने सर्वत्र शेतपरिसरात रोवणीला प्रारंभ झाला आहे. मात्र खिशात पैसे नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे विलंबाने का होईना खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळतील, अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक देवून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.१५ मे पासून जेवनाळा येथे हमी केंद्रावर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. संपूर्ण जून महिना उलटला तरी देखील शेतकºयांच्या हातावर रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पावलोपावली समस्या भेडसावत आहेत. बी-बियाणे, खते व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना देखील शासनाकडून धानांच्या चुकाऱ्यांसाठी दुर्लक्ष होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून आपले गाऱ्हाणे मांडले आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून परिचित असताना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे शासनाचे डोळेझाक होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत धान चुकाऱ्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.