शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

धान उत्पादक धडकले जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:54 IST

'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे४८ दिवसानंतरही चुकारे नाही : अधिकाऱ्यांनी केले हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : 'सबका साथ सबका विकास' अशी घोषणा असताना शासनाचीे पुन्हा शेतकऱ्यांविषयी उदासीनता दिसून येत आहेत. धान हमी केंद्रावर धान विकून ४५ दिवसांचा कालावधी लोटला असताना देखील आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना चुकारे न मिळाल्याने शेतकरी खरीपाच्या तोंडावर संकटात सापडला आहे.पालांदूर परिसरात पावसाने सुरूवात केली असल्याने सर्वत्र शेतपरिसरात रोवणीला प्रारंभ झाला आहे. मात्र खिशात पैसे नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे विलंबाने का होईना खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळतील, अशी आशा होती. परंतु ती फोल ठरली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना देखील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंगच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक देवून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.१५ मे पासून जेवनाळा येथे हमी केंद्रावर धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. संपूर्ण जून महिना उलटला तरी देखील शेतकºयांच्या हातावर रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पावलोपावली समस्या भेडसावत आहेत. बी-बियाणे, खते व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना देखील शासनाकडून धानांच्या चुकाऱ्यांसाठी दुर्लक्ष होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना भेटून आपले गाऱ्हाणे मांडले आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून परिचित असताना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्याकडे शासनाचे डोळेझाक होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत धान चुकाऱ्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.