शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
13
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
14
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
15
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
16
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
17
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
18
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
19
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
20
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

धान नर्सरीला तडे, पऱ्हे पडले पिवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST

भंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सुरुवातीला दमदार बरसल्यानंतर पावसाने आता दहा दिवसांपासून विश्रांती घेतली ...

भंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सुरुवातीला दमदार बरसल्यानंतर पावसाने आता दहा दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. मोठ्या आशेने नर्सरी केलेली, पेरणी उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी नर्सरीच्या जमिनीला तडे गेले असून लागवडयोग्य पऱ्हेही पिवळे पडत आहेत. आणखी दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकणार आहे.

कोरोना संसर्ग आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना गत दोन वर्षांपासून बसत आहे. यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचे संकेत दिले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसू लागला. उधार उसणवार आणि बँकांचे कर्ज घेऊन धान बियाण्यांची खरेदी केली. मशागत करून नर्सरीत धानाची पेरणी केली. मृग नक्षत्रापासून दमदार पाऊस बरसत होता. त्यामुळे शेतकरी उत्साहात होता. परंतु आता दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली. दररोज सायंकाळी वादळी आणि पावसाळी वातावरण तयार होते, परंतु पाऊस कोसळत नाही. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यात १ लाख ८३ हजार २५ हेक्टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात नर्सरीचे क्षेत्र १३ हजार ५५९ हेक्टर आहे. जवळपास संपूर्ण क्षेत्रावर नर्सरी पेरणी झाली आहे. तर २ हजार हेक्टरवर रोवणीही आटोपली आहे. परंतु आता पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणीची कामे खोळंबली आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी नर्सरीच्या जमिनीला तडे जात आहेत. रोवणीयोग्य पऱ्हेही पिवळे पडत आहेत. जिल्ह्यात सर्वदूर सारखीच स्थिती आहे.

सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरडवाहू शेतकरी आकाशाकडे पाहत असून प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून नैसर्गिक प्रकोपाचा सामना करीत आहेत. कोरोना संकटाने तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. धानविक्रीचाही प्रश्न प्रलंबित आहे. अशा अनेक संकटांसोबत आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गावागावांत पावसासाठी वरुण राजाला विनवणी केली जात आहे. मात्र सायंकाळी वातावरण पावसाळी होऊन पाऊस मात्र कोसळत नाही.

पावसाने आणखी काही दिवस विश्रांती घेतली तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट येणार आहे. आधीच कर्ज काढून बिजवाई खरेदी केली. मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला. दुबार पेरणीची वेळ आली तर अर्धी अधिक शेती पडीक राहण्याची शक्यता आहे. पाऊस केव्हा कोसळेल याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात ३०४.५ मिमी पावसाची नोंद

n जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैपर्यंत ३०४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत २९५.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सरासरीपेक्षा पाऊस तीन टक्के अधिक असला तरी कोसळलेला पाऊस हा मृग आणि आद्रा नक्षत्रातील आहे. गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. धानपिकासाठी मुबलक पावसाची आवश्यकता असून हवामान खात्याने दिलेला अंदाज यंदा चुकतो की काय अशी स्थिती आहे.