शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

धान मळणी जोरात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 00:27 IST

सध्या खरीप हंगामाचे हलक्या व भारी धानाचे पीक निघाले असून बळीराजाची धान मळणी जोरात सुरु आहे.

आर्थिक संकट : शेतकऱ्यांचे नियोजन बिघडणारकुंभली : सध्या खरीप हंगामाचे हलक्या व भारी धानाचे पीक निघाले असून बळीराजाची धान मळणी जोरात सुरु आहे. बळीराजा मोठ्या उत्सुकतेने धान मळणी करीत आहे. धानाचे पीक हाती येईपर्यंत लागणारा खर्च उदा. बियाणे, खत, मजूरी, मशागत, कापणी, मळणी इत्यादी निघून बाकी संसाराचा खर्च कसा भागवायचा या उद्देशाने शेतकरी मोठ्या आशेने मेहनत घेतो. परंतु धानाला उतारा नसल्यामुळे व धानाया योग्य भाव नसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत अधिक भर पडत आहे.त्यातल्या त्यात निसर्गाचा लहरीपणा, निसर्गाचा प्रकोप, अपूरा पाऊस, धानावर आलेले रोग व त्यासाठी लागणारा औषधांचा खर्च परवडणारा नसला तरी हातचे पीक जाऊ नये यासाठी आलेला खर्च व जीवाचे रान शेतकऱ्याला करावेच लागते. परंतु मळणीनंतर त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. धानाला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे वर्षभराचे नियोजन हे धान विक्रीवर अवलंबून असते. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. जून-जुलै मध्ये पेरणी केलेल्या धानाचे उत्पादन डिसेंबर-जानेवारीमध्ये होत असते. त्यानुसार शेतकरी वर्षभराचे नियोजन करतो व उर्वरित धान विक्रीला काढतो. तसेच घेतलेला पीक कर्जाची परतफेड मार्च अखेरपर्यंत करायची असल्यामुळे धान विक्रीला काढतो. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.याकरिता शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा व या आर्थिक विवंचनेतून बळीराजाला बाहेर पडण्यासाठी प्रतिनिधीनी व सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे. (वार्ताहर)