शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दलित वस्तीचा निधी नियमबाह्य खर्च

By admin | Updated: September 11, 2014 23:16 IST

गावाच्या विकासासाठी दलित वस्ती सुधारणा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रूपयांचा निधी नियमबाह्यरित्या खर्च करण्यात आला आहे.

लाखांदुरातील प्रकार : गुण नियंत्रण विभागाकडून चौकशीची मागणीलाखांदूर : गावाच्या विकासासाठी दलित वस्ती सुधारणा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रूपयांचा निधी नियमबाह्यरित्या खर्च करण्यात आला आहे. गावात झालेल्या सिमेंट रस्ते बांधकामाची गुण नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत सुधारणा करण्याकरीता प्राप्त तरतुदीच्या अधीन राहून सन २०१३-१४ मध्ये १३ सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना व नागरी सुविधा योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या तिन्ही योजनेची कामे पूर्ण करण्यासंदर्भात ग्रामपंचयतने करारनामा केला. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील अनुदान खर्च करण्यासाठी त्या वस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या निकषाप्रमाणे आहे. लोकसंख्या नसेल त्या कामाचे करारनामा करू नये, त्याबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना लेखी कळवावे. चुकीच्या ठिकाणी काम केल्यास ग्रामपंचायत सचिव, संबंधित अभियंता तथा खंडविकास अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, असे आदेश असतानाही दलित वस्तीचा निधी नियमबाह्यरित्या खर्च करण्यात आला.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीत लोकसंख्या आधारावर निधी उपलब्ध होत असतो. १० ते २५ लोकसंख्येसाठी २ लाख रुपयांचा निधी, २६ ते ५० लोकसंख्येसाठी ५ लाख, ५१ ते १०० लोकसंख्येसाठी ८ लाख, १०१ ते १५० लोकसंख्येसाठी १२ लक्ष, १५१ ते ३०० लोकसंख्येसाठी १५ लाख, ३०१ पेक्षा अधिक लोकसंख्येसाठी २० लाखापेक्षा अधिक निधी देण्यात येतो. त्या निधीतून त्या भागातील विकास कामावर निधी खर्च करण्याचा शासन निर्णय आहे. असे असताना, लाखांदूर ग्रामपंचायत अंतर्गत काही वॉर्डात दलित वस्ती नसतानाही लाखोंचा निधी खर्च करण्यात आला आहे. याउलट दलित वस्तीच्या नावाने मंजूर निधी अन्य वॉर्डात सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी खर्च करण्यात आला. मंजूर झालेल्या कामांमध्ये बदल करता येत नसतानाही सरपंचाने निधी अन्यत्र वळविला. एखाद्या योजनेचा लाभ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने घेतल्यास कारवाईस पात्र ठरतो. परंतू ग्रामपंचायत एजंसीला पुढे करून सरपंचाने कोट्यवधींचे कामे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन घरे असलेल्या ठिकाणी दलित वस्तीचा ५ लाखाचा निधी खर्च केल्याचा व रस्ता तयार केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. शासकीय बांधकाम करण्यापूर्वी बांधकामाची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, याकरीता काम सुरू करण्यापूर्वी कामाचे नामफलक लावण्यात आलेले नाहीत. काम पूर्ण झाले असताना फलक लागलेले नाही. (तालुका प्रतिनिधी)