शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पालांदूर परिसरास आजाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल आलेला आहे. या बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. डास, दूषितपाणी यांचे सुद्धा मानवी आरोग्यावर ...

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल आलेला आहे. या बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. डास, दूषितपाणी यांचे सुद्धा मानवी आरोग्यावर परिणाम दिसत आहेत. कोरोनाचे संकट काही अंशी टळलेले असले तरी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. थोडासा सुद्धा ताप आला तरी कोरोनाची आठवण ताजी होते. शासन प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या लाटेची सूचना दिलेली आहे. त्यामुळे आम जनतेन सावधगिरी बाळगणे काळाची गरज आहे. मलेरिया, विषमज्वरची रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासनाने सुद्धा स्वच्छतेवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी सुद्धा स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता स्वतःपासूनच पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

कुटुंबात दररोज पाणी उकळून थंड करून प्यावे, शिळे उघड्यावरचे अन्न खाऊ नये, ताप अंगावर काढू नये, ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, नाहक पावसात भिजू नये, सकस आहार घ्यावा, दिवसातून वारंवार हात धुण्याची सवय लावावी, बाहेर जाणे असल्यास गर्दी टाळीत मास्कचा वापर करावा. आदी आरोग्य टिप्सची अंमलबजावणी प्रत्येकाने करावी.

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. स्वतः कुटुंबातील व शेजारील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. विषाणूजन्य आजाराची साथ आहे. नियमित स्वच्छता व मास्क वापरा.

डॉ. आशिष गभने, वैद्यकीय अधिकारी,

ग्रामीण रुग्णालय पालांदूर