शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

पथदिव्यांचे वीज बिल भरण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून गावातील स्ट्रीट लाईटचे बिल शासनाकडून भरले जात होते. मात्र, गत काही वर्षांपासून शासनाने या बिलाची रक्कम ...

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून गावातील स्ट्रीट लाईटचे बिल शासनाकडून भरले जात होते. मात्र, गत काही वर्षांपासून शासनाने या बिलाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरावी. असे आदेश काढल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अडचणीत वाढ झालेली आहे. गाव पातळीवर जनसामान्यांकडून अपेक्षितपणे कर वसुली होत नाही. आणखी विद्युत बिलाची भरपाई ग्रामपंचायतीने करावी. असा आदेश शासनाने काढल्याने ग्रामपंचायतीच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

लाखनी तालुक्यातील सुमारे २५ गावांची वीज कापण्यात आली. १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकार पायाभूत सुविधांची निर्मिती, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा यासाठी नियोजित असते. या निधीच्या रकमेतून वीज बिल किंवा इतर कामासाठी खर्च केल्यास ग्रामपंचायतीचे आर्थिक खर्च भागविणे कठीण ठरणार आहे. शासनाने काढलेला निर्णय हा चुकीचा असून, हे वीज बिल शासनाने भरावे, अशी सरपंच संघटनेकडून मागणी होत आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे, धनंजय घाटबांधे, प्रशांत मासुरकर, पंकज चेटुले, संगीता बारस्कर, संगीता घोनमोडे, कल्पना सेलोकर, देवनाथ निखाडे, रूपचंद चौधरी, सुधाकर हटवार, परसराम फेंडर, रसिका कांबळे, विना नागलवाडे, नरेंद्र भांडारकर, रामलाल पाटणकर, बावनकुळे धाबेटेकडी, आदी सरपंच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

चौकट

१५ वा वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार देतो व अंमलबजावणी राज्य सरकार करते. हे निश्चितच योग्य वाटत नाही. १४ वित्त आयोगाची व्याजाची रक्कम अजूनपर्यंत जिल्हा परिषदेला बाकी आहे. त्या रकमेतून विजेचे बिल भरावे. नियमितपणे दर वर्षाला पथदिव्यांची वीज बिलाची व्यवस्था शासनाने स्वतःच्या स्तरावरून करावी. यापूर्वीसुद्धा शासनाने भरलेली होती. तेच नियोजन नेहमीकरिता लागू करावे, अशी रास्त मागणी सरपंच संघटना तालुका लाखनी यांनी खंडविकास अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया -

राज्य सरकार व जिल्हा परिषद स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने वीज बिलाची व्यवस्था करावी.

ग्रामपंचायतीने वीज बिल व पाणीपुरवठ्याच्या कर वसुलीतून काही वीज बिल भरावे. उर्वरित निधी पंधराव्या आयोगातून भरावे. त्यामुळे वीज विभागाचे देय सुद्धा थकीत राहणार नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने विज बिल भरण्याकरिता सहकार्य करावे.

डॉ. शेखर जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी.