शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

पथदिव्यांचे वीज बिल भरण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून गावातील स्ट्रीट लाईटचे बिल शासनाकडून भरले जात होते. मात्र, गत काही वर्षांपासून शासनाने या बिलाची रक्कम ...

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून गावातील स्ट्रीट लाईटचे बिल शासनाकडून भरले जात होते. मात्र, गत काही वर्षांपासून शासनाने या बिलाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरावी. असे आदेश काढल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अडचणीत वाढ झालेली आहे. गाव पातळीवर जनसामान्यांकडून अपेक्षितपणे कर वसुली होत नाही. आणखी विद्युत बिलाची भरपाई ग्रामपंचायतीने करावी. असा आदेश शासनाने काढल्याने ग्रामपंचायतीच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

लाखनी तालुक्यातील सुमारे २५ गावांची वीज कापण्यात आली. १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकार पायाभूत सुविधांची निर्मिती, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा यासाठी नियोजित असते. या निधीच्या रकमेतून वीज बिल किंवा इतर कामासाठी खर्च केल्यास ग्रामपंचायतीचे आर्थिक खर्च भागविणे कठीण ठरणार आहे. शासनाने काढलेला निर्णय हा चुकीचा असून, हे वीज बिल शासनाने भरावे, अशी सरपंच संघटनेकडून मागणी होत आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे, धनंजय घाटबांधे, प्रशांत मासुरकर, पंकज चेटुले, संगीता बारस्कर, संगीता घोनमोडे, कल्पना सेलोकर, देवनाथ निखाडे, रूपचंद चौधरी, सुधाकर हटवार, परसराम फेंडर, रसिका कांबळे, विना नागलवाडे, नरेंद्र भांडारकर, रामलाल पाटणकर, बावनकुळे धाबेटेकडी, आदी सरपंच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

चौकट

१५ वा वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार देतो व अंमलबजावणी राज्य सरकार करते. हे निश्चितच योग्य वाटत नाही. १४ वित्त आयोगाची व्याजाची रक्कम अजूनपर्यंत जिल्हा परिषदेला बाकी आहे. त्या रकमेतून विजेचे बिल भरावे. नियमितपणे दर वर्षाला पथदिव्यांची वीज बिलाची व्यवस्था शासनाने स्वतःच्या स्तरावरून करावी. यापूर्वीसुद्धा शासनाने भरलेली होती. तेच नियोजन नेहमीकरिता लागू करावे, अशी रास्त मागणी सरपंच संघटना तालुका लाखनी यांनी खंडविकास अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया -

राज्य सरकार व जिल्हा परिषद स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने वीज बिलाची व्यवस्था करावी.

ग्रामपंचायतीने वीज बिल व पाणीपुरवठ्याच्या कर वसुलीतून काही वीज बिल भरावे. उर्वरित निधी पंधराव्या आयोगातून भरावे. त्यामुळे वीज विभागाचे देय सुद्धा थकीत राहणार नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने विज बिल भरण्याकरिता सहकार्य करावे.

डॉ. शेखर जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी.