शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांचे वीज बिल भरण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून गावातील स्ट्रीट लाईटचे बिल शासनाकडून भरले जात होते. मात्र, गत काही वर्षांपासून शासनाने या बिलाची रक्कम ...

राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून गावातील स्ट्रीट लाईटचे बिल शासनाकडून भरले जात होते. मात्र, गत काही वर्षांपासून शासनाने या बिलाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने भरावी. असे आदेश काढल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अडचणीत वाढ झालेली आहे. गाव पातळीवर जनसामान्यांकडून अपेक्षितपणे कर वसुली होत नाही. आणखी विद्युत बिलाची भरपाई ग्रामपंचायतीने करावी. असा आदेश शासनाने काढल्याने ग्रामपंचायतीच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

लाखनी तालुक्यातील सुमारे २५ गावांची वीज कापण्यात आली. १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा केंद्र सरकार पायाभूत सुविधांची निर्मिती, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा यासाठी नियोजित असते. या निधीच्या रकमेतून वीज बिल किंवा इतर कामासाठी खर्च केल्यास ग्रामपंचायतीचे आर्थिक खर्च भागविणे कठीण ठरणार आहे. शासनाने काढलेला निर्णय हा चुकीचा असून, हे वीज बिल शासनाने भरावे, अशी सरपंच संघटनेकडून मागणी होत आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष म. वा. बोळणे, धनंजय घाटबांधे, प्रशांत मासुरकर, पंकज चेटुले, संगीता बारस्कर, संगीता घोनमोडे, कल्पना सेलोकर, देवनाथ निखाडे, रूपचंद चौधरी, सुधाकर हटवार, परसराम फेंडर, रसिका कांबळे, विना नागलवाडे, नरेंद्र भांडारकर, रामलाल पाटणकर, बावनकुळे धाबेटेकडी, आदी सरपंच संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

चौकट

१५ वा वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार देतो व अंमलबजावणी राज्य सरकार करते. हे निश्चितच योग्य वाटत नाही. १४ वित्त आयोगाची व्याजाची रक्कम अजूनपर्यंत जिल्हा परिषदेला बाकी आहे. त्या रकमेतून विजेचे बिल भरावे. नियमितपणे दर वर्षाला पथदिव्यांची वीज बिलाची व्यवस्था शासनाने स्वतःच्या स्तरावरून करावी. यापूर्वीसुद्धा शासनाने भरलेली होती. तेच नियोजन नेहमीकरिता लागू करावे, अशी रास्त मागणी सरपंच संघटना तालुका लाखनी यांनी खंडविकास अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया -

राज्य सरकार व जिल्हा परिषद स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने वीज बिलाची व्यवस्था करावी.

ग्रामपंचायतीने वीज बिल व पाणीपुरवठ्याच्या कर वसुलीतून काही वीज बिल भरावे. उर्वरित निधी पंधराव्या आयोगातून भरावे. त्यामुळे वीज विभागाचे देय सुद्धा थकीत राहणार नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने विज बिल भरण्याकरिता सहकार्य करावे.

डॉ. शेखर जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी.