शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत दोनच भातखाचरे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

लाखांदूर : स्थानिक ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाच्या मग्रारोहयो कामाच्या मागणीतील घट व शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यात केवळ दोनच भातखाचऱ्यांची मजुरी ...

लाखांदूर : स्थानिक ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाच्या मग्रारोहयो कामाच्या मागणीतील घट व शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यात केवळ दोनच भातखाचऱ्यांची मजुरी कामे सुरू असल्याची माहिती आहे. तथापि, या योजनेंतर्गत तालुक्यातील अन्य ग्रा.पं. क्षेत्रात मजुरीची कामे उपलब्ध करण्यात न आल्याने तालुक्यातील हजारो मजुरांचा मजुरी कामाविना घरातच ठिय्या असल्याची ओरड आहे.

प्राप्त माहितीनुसार शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणात मजुरी कामे उपलब्ध केली जातात. सदर मजुरी कामे या योजनेचे 60:40 प्रमाण ठेवून अकुशल कामांतर्गत उपलब्ध केली जात असल्याची माहिती आहे. या कामांमध्ये भातखाचरे, पांदण रस्ते मातीकाम, तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, यासह अन्य अकुशल कामांचा समावेश आहे. दरम्यान, यंदा तालुक्यात नापिकी आल्याने या भागातील पीक उत्पादकतेत घट येऊन आणेवारीदेखील घसरली आहे. या परिस्थितीत तालुक्यातील सर्वच शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनता आर्थिक संकटात असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नापिकीमुळे तालुक्यात निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात मग्रारोहयोंतर्गत मजुरी कामे उपलब्ध होणार असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे. मात्र, तालुक्यातील 62 ग्रा.पं.अंतर्गत अत्यल्प प्रमाणात या योजनेंतर्गत मजुरी कामांची मागणी होऊन तालुक्यात सद्य:स्थितीत केवळ दोनच भताखाचऱ्यांची कामे सुरू असल्याची माहिती आहे. सदर कामे तालुक्यातील पाचगाव व मुर्झा आदी दोन ग्रा.पं. क्षेत्रात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शासनाच्या मग्रारोहयो कायद्यांतर्गत ‘मागेल त्याला मजुरी’ काम असे सांगत १०० दिवस मजुरी कामाची हमीदेखील देण्यात आली. मात्र, स्थानिक ग्रा.पं. व शासन प्रशासनाच्या दुर्लक्षित व उदासीन धोरणामुळे सदर योजनेंतर्गत तालुक्यात मजुरी कामे उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील हजारो मजूर कामाविना घरी ठिय्या मांडून असल्याची ओरड आहे.

याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन ग्रा.पं. अंतर्गत मग्रारोहयो कामाच्या मागणीत वाढ होण्यासह मजुरी कामे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.