शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

नदीतील विहिरीत केवळ दीड फूट पाणी

By admin | Updated: April 27, 2016 00:24 IST

जीवनदायीनी बावनथडी नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असून गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची नदीपात्रातील विहीर शेवटचीच घटका मोजत आहे.

वक्रद्वार उघडण्याचा शिवसेनेचा इशारा : बावनथडी नदी कोरडी, १७ हजार नागरिकांना तीव्र पाणी टंचाईमोहन भोयर  तुमसरजीवनदायीनी बावनथडी नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असून गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची नदीपात्रातील विहीर शेवटचीच घटका मोजत आहे. विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. सहा गावातील १६ ते १७ हजार नागरिकांना तीव्र पाणी टंचाई भेडसावीत आहे. बावनथडी धरणाची दारे स्वत: उघडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.गोबरवाही येथे जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेची विहीर बावनथडी नदीपात्रात पाथरी या गावाजवळ आहे. सुमारे २५ वर्षापासून ही योजना यशस्वीपणे सुरु होती. एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाळ्यात बावनथडी नदी पात्र कोरडे पडले. विहिरीचे जलस्त्रोत बंद झाले. सध्या विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. संपूर्ण मे महिना शिल्लक आहे.गोबरवाही, राजापूर, चिखला, सीतासावंगी, नाकाडोंगरी, सुंदरटोला या गावात या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. १८५० नळ कनेक्शनधारक आहे. सुमारे १६ ते १७ नागरिकांना यापूर्वी मुबलक पाणी मिळत तरी होते. सध्या ही पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र आहे.प्रकल्पातून पाणी सोडणे एकमेव पर्यायप्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरु राहावी याकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे हा एकमेव पर्याय आहे. परंतु धरणात पाणीसाठा शिल्लक नाही.असे प्रकल्पांचे अभियंते सांगत आहेत. मृत जलसाठा नदीत प्रवाहित करता येत नाही. असा नियम त्यांनी सांगितला.शिवसेनेचे नेते तथा पंचायत समितीचे उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी बावनथडी प्रकल्पाचे वक्रद्वार शिवसैनिकांसोबत स्वत: उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. प्रकल्पात जलसाठा आहे. निदान पिण्याकरिता पाणी सोडावेच लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली.पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता धनंजय बावनकर व इतर अधिकाऱ्यांनी बावनथडी नदी पात्रातील विहिरींची पाहणी केली. केवळ दीड ते दोन फुट पाणी विहिरीत शिल्लक असल्याचा अहवाल त्यांनी प्रशासनाकडे पाठविला आहे.येथे पाणी पेटण्याची शकयता नाकारता येत नाही.बावनथडी नदी पात्राशेजारील १० ते १५ गावातील शेतकऱ्यांनी ऊस व इतर भाजीपाला लावला. ऊस पिकांना पाणी नाही. त्यामुळे ते जळण्याच्या स्थितीत आहेत. भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे.बावनथडी धरणातून पाणी प्रशासनाने न सोडल्यास आपण स्वत: शिवसैनिकांसोबत प्रकल्पाचे वक्रद्वार सुरु करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पाणी समस्या दूर करणे प्रशासनाचे काम आहे.- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती, पं.स. पवनीगोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दोन फुट पाणी साठा उपलब्ध आहे. मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणारत आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने जलस्त्रोत नाही.- धनंजय बावनकर, उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग, पं.स. तुमसर