शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

दोन वर्षांत केवळ ३८ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: May 11, 2017 00:18 IST

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून मदत दिली जाते.

योजनेला अल्प प्रतिसाद : गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनादेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून मदत दिली जाते. दोन वर्षांत जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रस्ताव दाखल केले होते. मात्र, केवळ ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ११ प्रस्ताव नामंजूर झाले असून २९ प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी १० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. दरम्यान ही प्रक्रिया किचकट असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची पायपीट होत आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २००५-०६ मध्ये शेतकरी व्यक्तीगत दुर्घटना विमा योजना सुरू केली. त्यानंतर २००९-१० मध्ये या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता दुर्घटना विमा योजना असे नामकरण करण्यात आले. २०१५-१६ मध्ये या योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. नियम व अटी जाचक असल्याने अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शेतकऱ्यांच्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आले तरीही या योजनेचा लाभ देण्यात येतो. विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी, एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या हानीसाठी दोन लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येते. त्यासाठी अपघाग्रस्त व्यक्ती शेतकरी आहे का? अपघाताचा पंचनामा व इतर सोपस्कार करण्यात येत असल्याने मदत मिळण्यासाठी विलंब होतो. विमा मिळविण्यासाठी योजना चांगली असली तरी दोन लाख रूपयांसाठी विविध प्रकारची कागदपत्रे वेगवेगळ्या कार्यालयातून संकलित करावे लागतात. ग्रामीण भागात कागदपत्र सहज मिळत नसल्याने समस्या बिकट बनली आहे. बहुतांश शेतकरी विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक विवंचनेमुळे विम्याचे हप्ते भरण्यासाठी अडचणी येतात. दरम्यान, शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. परंतु दरवर्षी विमा कंपनी बदलत असल्याने शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळण्यासाठी मर्यादा येत आहेत. २०१५-२०१६ मध्ये ८५ प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र ३८ शेतकरी अपघात विमा योजनेत पात्र ठरले आहे. २०१६-२०१७ मध्ये जिल्ह्यात केवळ ३ प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यातील एक प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले असून दोन प्रकरणे आवश्यक त्या कागदपत्राच्या पुर्ततेअभावी प्रलंबित आहेत.