शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जिल्ह्यात केवळ ३१ टक्के जलसाठा; मामा तलावांत ठणठणाट

By युवराज गोमास | Updated: May 10, 2024 19:53 IST

मध्यम व लघु प्रकल्प तळाला : जलसंकटाची चाहूल, पाणी वापरा जपून

भंडारा: जिल्हयातील मध्यम, लघु प्रकल्प तळाला गेेले आहेत. तर जुने मालगुजारी तलावांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सध्यास्थितीत उपयुक्त जलसाठा ३७.८८ दलघमी असून टक्केवारी ३१ टक्के इतकी आहे. परिणामी जिल्ह्यातील गावागावात तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असतांना प्रखर उन्हाने बाष्पीभवन वेगाने सुरू आहे. परिणामी उकड्यात वाढ झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होवून भटकंती वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली व सोरणा आदी ४ मध्यंम प्रकल्प असून २ मेपर्यंत या प्रकल्पात १६.७७२ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ३९ टक्के आहे. मे व जून महिन्याच्या प्रारंभी प्रकल्पातील जलसाठ्यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी प्रकल्प क्षेत्रातील भागात नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. यात कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, टांगा, हिवरा, आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली-आंबाडी, वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, शिवनीबांध, कुंभली, गुढरी, सालेबर्डी, भूगावमेंढा, मुरमाडी-हमेशा, रेंगेपार-कोठा, न्याहारवानी, वाकल व खुर्शिपार आदी प्रकल्पांचा समावेश आहे. सध्यास्थितीत लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १४.६७५ दलघमी असून टक्केवारी २७.४०९ इतकी आहे. या प्रकल्पापैकी शिवनीबांध, कारली व कवलेवाडा या ३ प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा १ दलघमीपेक्षा अधिक आहे, तर उर्वरीत २८ प्रकल्प तळाला गेले आहे.

२८ मामा तलावाची स्थिती गंभीर

जिल्ह्यात २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. या तलावांमध्ये एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंध, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार-कोहळी, कान्हेरी, चान्ना, डाेंगरगाव, एलकाझरी, जांभोरा, कोका, लोभी, पिंपळगाव, चपराळ, इंदोरा, दिघोरी, दहेगाव व झरी यांचा समावेश आहे. या तलावांत मे प्रारंभी ६.४३० दलघमी इतका उपयुक्त जलसाठा असून टक्केवारी २५.३०९ इतकी आहे. यातील केवळ पिंपळगाव तलावात १ दलघमीपेक्षा अधिक उपयुक्त जलसाठा असून इतर तलावांना कोरड पडली आहे. यातील अनेक तलावात थेंबभर पाणीही मिळेनासे झाले आहे.

नदी, नाल्यांचे पात्र पडले कोरडे

जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह अन्य उपनद्यांत पाण्याची पातळी कमालीने घटली आहे. चुलबंद, बावनथडी व सूर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गोसे व बावनथडी धरणाचे बॅक वॉटर परिसरातही स्थिती नाजूक होत चालली आहे. नाल्यांतील पात्र तर मार्च महिन्यातच कोरडे पडले आहेत.

नळ योजना होणार प्रभावीत

जिल्ह्यातील नदी, नाल्यांवर गावागावातील नळ योजनांच्या विहिरी आहेत. यातील काही पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठले आहे. मे महिन्याच्या पंधरवाडात नळ योजना प्रभावीत होवून विहिरी कोरड्या पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

प्रकल्प दलघमी टक्केवारीमध्यम १६.७७ ३९.१७लघु १४.६७ २७.४०मामा ६.४३ २५.३०एकूण ३७.८८ ३१.१०

टॅग्स :bhandara-acभंडारा