शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जिल्ह्यात केवळ ३१ टक्के जलसाठा; मामा तलावांत ठणठणाट

By युवराज गोमास | Updated: May 10, 2024 19:53 IST

मध्यम व लघु प्रकल्प तळाला : जलसंकटाची चाहूल, पाणी वापरा जपून

भंडारा: जिल्हयातील मध्यम, लघु प्रकल्प तळाला गेेले आहेत. तर जुने मालगुजारी तलावांत पाण्याचा ठणठणाट आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सध्यास्थितीत उपयुक्त जलसाठा ३७.८८ दलघमी असून टक्केवारी ३१ टक्के इतकी आहे. परिणामी जिल्ह्यातील गावागावात तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपासून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असतांना प्रखर उन्हाने बाष्पीभवन वेगाने सुरू आहे. परिणामी उकड्यात वाढ झाली आहे. गावागावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होवून भटकंती वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली व सोरणा आदी ४ मध्यंम प्रकल्प असून २ मेपर्यंत या प्रकल्पात १६.७७२ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ३९ टक्के आहे. मे व जून महिन्याच्या प्रारंभी प्रकल्पातील जलसाठ्यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी प्रकल्प क्षेत्रातील भागात नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहेत. यात कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, टांगा, हिवरा, आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली-आंबाडी, वाही, भिवखिडकी, कातुर्ली, पिलांद्री, शिवनीबांध, कुंभली, गुढरी, सालेबर्डी, भूगावमेंढा, मुरमाडी-हमेशा, रेंगेपार-कोठा, न्याहारवानी, वाकल व खुर्शिपार आदी प्रकल्पांचा समावेश आहे. सध्यास्थितीत लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १४.६७५ दलघमी असून टक्केवारी २७.४०९ इतकी आहे. या प्रकल्पापैकी शिवनीबांध, कारली व कवलेवाडा या ३ प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा १ दलघमीपेक्षा अधिक आहे, तर उर्वरीत २८ प्रकल्प तळाला गेले आहे.

२८ मामा तलावाची स्थिती गंभीर

जिल्ह्यात २८ जुने मालगुजारी तलाव आहेत. या तलावांमध्ये एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबंध, परसोडी, खंडाळा, लवारी, उमरी, सितेपार, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार-कोहळी, कान्हेरी, चान्ना, डाेंगरगाव, एलकाझरी, जांभोरा, कोका, लोभी, पिंपळगाव, चपराळ, इंदोरा, दिघोरी, दहेगाव व झरी यांचा समावेश आहे. या तलावांत मे प्रारंभी ६.४३० दलघमी इतका उपयुक्त जलसाठा असून टक्केवारी २५.३०९ इतकी आहे. यातील केवळ पिंपळगाव तलावात १ दलघमीपेक्षा अधिक उपयुक्त जलसाठा असून इतर तलावांना कोरड पडली आहे. यातील अनेक तलावात थेंबभर पाणीही मिळेनासे झाले आहे.

नदी, नाल्यांचे पात्र पडले कोरडे

जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह अन्य उपनद्यांत पाण्याची पातळी कमालीने घटली आहे. चुलबंद, बावनथडी व सूर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गोसे व बावनथडी धरणाचे बॅक वॉटर परिसरातही स्थिती नाजूक होत चालली आहे. नाल्यांतील पात्र तर मार्च महिन्यातच कोरडे पडले आहेत.

नळ योजना होणार प्रभावीत

जिल्ह्यातील नदी, नाल्यांवर गावागावातील नळ योजनांच्या विहिरी आहेत. यातील काही पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठले आहे. मे महिन्याच्या पंधरवाडात नळ योजना प्रभावीत होवून विहिरी कोरड्या पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

प्रकल्प दलघमी टक्केवारीमध्यम १६.७७ ३९.१७लघु १४.६७ २७.४०मामा ६.४३ २५.३०एकूण ३७.८८ ३१.१०

टॅग्स :bhandara-acभंडारा