शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:09 IST

अत्यल्प पर्जन्यमानामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पातील जलसाठ्यात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६३ प्रकल्पांमध्ये केवळ १४.५६ टक्के जलसाठा आहे. परिणामी, येत्या काळात रणरणत्या उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे१७ प्रकल्प कोरडे : मालगुजारी तलावांची स्थितीही बिकट, यावर्षीचा उन्हाळा ठरणार जीवघेणा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अत्यल्प पर्जन्यमानामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पातील जलसाठ्यात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६३ प्रकल्पांमध्ये केवळ १४.५६ टक्के जलसाठा आहे. परिणामी, येत्या काळात रणरणत्या उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.भंडारा जिल्ह्यात सरासरी १,३३० मि.मी. पाऊस बरसतो. यावरच सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही अवलंबून असतो. दुसरीकडे भूजलाची पातळी सातत्याने घसरत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ७.५१ टक्के जलसाठा आहे. यात मोहाडी तालुक्यातील सोरणा मध्यम प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे.याशिवाय चांदपूर जलाशयात ८.६४ टक्के, बघेडा १२.६२ टक्के तर बेटेकर (बोथली) प्रकल्पात ४.७७ टक्के जलसाठा आहे. उन्हाळयाला प्रारंभ झाला असून आणखी तीन महिने ऊन्ह तापणार असून या प्रकल्पांमध्ये केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात आजघडीला पाणी टंचाईचे सावट आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य लहानमोठ्या तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याचा अपव्यय व जल पुर्नभरणाकडे दुर्लक्ष होत गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात आता अवर्षणाची चिन्हे दिसू लागली असून पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी शेती कसण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मनाई केली होती.भंडारा शहर ते गोसेखुर्द धरणापर्यत वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी आहे. मात्र या पाण्याच्या सदुपयोगाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील गावांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जलशुद्धीकरणासाठी निधीची बोंब कायम आहे. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.परिणामी, जिल्हा प्रशसानाने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे पिण्याच्या पाण्याचे संकट व अवर्षण स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली. या अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यातील २०१ गावांपैकी १३१ गावे १०० टक्के ‘वॉटर न्युट्रल’ झालेली आहेत. मात्र या ‘वॉटर न्युट्रल’ गावांमध्येही पिण्याच्या पाण्याची ओरड असून यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.जनावरांनाही भेडसावणार पाणी टंचाईयावर्षीच्या पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसणार आहे. परंतु जनावरांनाही पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आधीच पशुधन घटलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा पशुधन घटण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या २८ जुने मालगुजारी तलावांमध्ये २०.४० टक्के पाणी उपलब्ध आहे.मे महिन्यात पाणी टंचाईचे सावटदरवर्षी होणारा अत्यल्प पाऊस आणि जलसाक्षरतेचा अभाव आदी कारणामुळे तलावांचा भंडारा जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची झळ बसत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ६५३ गावात पाणीटंचाईचे सावट असून तिसºया टप्प्यात २६४ गावात जलसंकटाची परिस्थिती राहण्याची शक्यता भूजल सर्व्हेक्षण विभागाने वर्तविली आहे.