शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

२३ दिवसांत केवळ ११ टक्के पाऊस

By admin | Updated: June 24, 2016 01:12 IST

रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल.

पावसाच्या हुलकावणीने शेतकरी संकटात : हवामान खात्याचा अंदाज चुकला, मागीलवर्षी २५५ मि.मी. पावसाची नोंदभंडारा : रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल. या हेतूने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना सुरूवातीलाच निराशेला सामोरे जावे लागत आहे.मृग नक्षत्र कोरडा गेला. मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल, अशी भाबडी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची पावसाने घोर निराशा केली आहे. मृग नक्षत्रात बियाणांची पेरणी केली तर उत्पन्न जास्त येते, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणाची लागवड केली. परंतु अनुकूल पाऊस न झाल्याने पेरणीला वेग आला नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे. भूतकाळातील कटू आठवणी विसरून नवे स्वप्न उराशी बाळगून येणारे दिवस ‘अच्छे दिन’ च्या रूपात समाधानाने जातील. संकटातील शेतकऱ्याला यावर्षी तरी दिलासा मिळेल असे वाटत असले, तरी पावसाची वाट पाहण्याखेरीज शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही.पूर्वीच्या नापिकीमुळे झालेले कर्जाचे ओझे विसरून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करून बियाणे खरेदी केले. परंतु सुरूवातीपासूनच निसर्ग हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळून पडले आहे. पेरणीला पाणी न मिळाल्याने यावर्षीही दुष्काळ पडेल का? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) हवामान खात्याचा अंदाज चुकलासुरूवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील हलक्या पावसानंतर मृग नक्षत्र कोरडे गेले. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित असल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.केवळ १७.२ मि.मी. पाऊसभंडारा जिल्ह्यात पावसाची सरासरी १३३०.२० मि.मी. इतकी आहे. सन २०१४ चा अपवाद वगळता ईतका पाऊस मागील पाच वर्षात पडला नाही. यावर्षी पावसाने दगा दिला आहे. २३ जूनपर्यंत १५० मि.मी. पावसाची सरासरी असताना यावर्षी केवळ १७.२ मि.मी. म्हणजे केवळ ११ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.