शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

२३ दिवसांत केवळ ११ टक्के पाऊस

By admin | Updated: June 24, 2016 01:12 IST

रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल.

पावसाच्या हुलकावणीने शेतकरी संकटात : हवामान खात्याचा अंदाज चुकला, मागीलवर्षी २५५ मि.मी. पावसाची नोंदभंडारा : रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल. या हेतूने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना सुरूवातीलाच निराशेला सामोरे जावे लागत आहे.मृग नक्षत्र कोरडा गेला. मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल, अशी भाबडी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची पावसाने घोर निराशा केली आहे. मृग नक्षत्रात बियाणांची पेरणी केली तर उत्पन्न जास्त येते, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणाची लागवड केली. परंतु अनुकूल पाऊस न झाल्याने पेरणीला वेग आला नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे. भूतकाळातील कटू आठवणी विसरून नवे स्वप्न उराशी बाळगून येणारे दिवस ‘अच्छे दिन’ च्या रूपात समाधानाने जातील. संकटातील शेतकऱ्याला यावर्षी तरी दिलासा मिळेल असे वाटत असले, तरी पावसाची वाट पाहण्याखेरीज शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही.पूर्वीच्या नापिकीमुळे झालेले कर्जाचे ओझे विसरून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करून बियाणे खरेदी केले. परंतु सुरूवातीपासूनच निसर्ग हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळून पडले आहे. पेरणीला पाणी न मिळाल्याने यावर्षीही दुष्काळ पडेल का? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) हवामान खात्याचा अंदाज चुकलासुरूवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील हलक्या पावसानंतर मृग नक्षत्र कोरडे गेले. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित असल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.केवळ १७.२ मि.मी. पाऊसभंडारा जिल्ह्यात पावसाची सरासरी १३३०.२० मि.मी. इतकी आहे. सन २०१४ चा अपवाद वगळता ईतका पाऊस मागील पाच वर्षात पडला नाही. यावर्षी पावसाने दगा दिला आहे. २३ जूनपर्यंत १५० मि.मी. पावसाची सरासरी असताना यावर्षी केवळ १७.२ मि.मी. म्हणजे केवळ ११ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.