शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

२३ दिवसांत केवळ ११ टक्के पाऊस

By admin | Updated: June 24, 2016 01:12 IST

रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल.

पावसाच्या हुलकावणीने शेतकरी संकटात : हवामान खात्याचा अंदाज चुकला, मागीलवर्षी २५५ मि.मी. पावसाची नोंदभंडारा : रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करुन नव्या जोमाने लागून चांगले उत्पन्न होईल, कर्जाचा भार कमी होईल. या हेतूने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना सुरूवातीलाच निराशेला सामोरे जावे लागत आहे.मृग नक्षत्र कोरडा गेला. मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल, अशी भाबडी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची पावसाने घोर निराशा केली आहे. मृग नक्षत्रात बियाणांची पेरणी केली तर उत्पन्न जास्त येते, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणाची लागवड केली. परंतु अनुकूल पाऊस न झाल्याने पेरणीला वेग आला नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता बळावली आहे. भूतकाळातील कटू आठवणी विसरून नवे स्वप्न उराशी बाळगून येणारे दिवस ‘अच्छे दिन’ च्या रूपात समाधानाने जातील. संकटातील शेतकऱ्याला यावर्षी तरी दिलासा मिळेल असे वाटत असले, तरी पावसाची वाट पाहण्याखेरीज शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही.पूर्वीच्या नापिकीमुळे झालेले कर्जाचे ओझे विसरून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. त्यानंतर पैशाची जुळवाजुळव करून बियाणे खरेदी केले. परंतु सुरूवातीपासूनच निसर्ग हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळून पडले आहे. पेरणीला पाणी न मिळाल्याने यावर्षीही दुष्काळ पडेल का? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) हवामान खात्याचा अंदाज चुकलासुरूवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील हलक्या पावसानंतर मृग नक्षत्र कोरडे गेले. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित असल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे.केवळ १७.२ मि.मी. पाऊसभंडारा जिल्ह्यात पावसाची सरासरी १३३०.२० मि.मी. इतकी आहे. सन २०१४ चा अपवाद वगळता ईतका पाऊस मागील पाच वर्षात पडला नाही. यावर्षी पावसाने दगा दिला आहे. २३ जूनपर्यंत १५० मि.मी. पावसाची सरासरी असताना यावर्षी केवळ १७.२ मि.मी. म्हणजे केवळ ११ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती.