शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

रबीचा केवळ १० टक्के पीक विमा

By admin | Updated: January 23, 2017 00:16 IST

जिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली.

१ हजार ७७२ शेतकऱ्यांचा सहभाग : ४६ हजारांपैकी ४,२१६ हेक्टरवरील पिकांचा समावेशदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रबी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ४ हजार २१६ हेक्टर रबी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.जिल्ह्यात आॅक्टोंबर २०१६ पासून रबीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रबी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकऱ्यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत ३ लाख ९८ हजार ५६२ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार २१६ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे. एकूण क्षेत्रापैकी केवळ १० टक्के याचे प्रमाण आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक अग्रेसररबी हंगाम २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील ४ हजार २१६ हेक्टर रबी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात १ हजार ७७२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सर्वाधिक १,४५५ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहभाग नोंदवून अव्वल स्थान पटकाविला आहे. त्याच बरोबर अलाहाबाद बँकेत १७८ शेतकरी, आंध्रा बँक ९, बँक आॅफ इंडीया १८, कॅनरा बँक ८४, पंजाब नॅशनल बँक २२, युनियन बँकेत ०५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.