शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राजकीय वरदहस्तामुळेच भंडाऱ्यात वन-वे नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वाढत्या लोकसंख्येनुसार भंडारा शहरातील वाहनांची संख्याही वाढल्याने वाहतुकीच्या समस्या गंभीर होत आहेत. त्यातच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : वाढत्या लोकसंख्येनुसार भंडारा शहरातील वाहनांची संख्याही वाढल्याने वाहतुकीच्या समस्या गंभीर होत आहेत. त्यातच राजकीय वरदहस्तामुळे भंडारा शहरातील वन-वे गत काही वर्षांपासून नावालाच उरले आहेत. भंडारा शहरात याच मार्गावर आठवड्यातून दोन दिवस आठवडा बाजार भरतो. त्यामुळे बुधवारी आणि रविवारी येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. यासोबतच इतरही दिवशी विविध खरेदीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. या मार्गावर असलेल्या अतिक्रमण व फेरीवाल्यांच्या हातगाड्या आणि दुकानांसमोर अस्ताव्यस्त लागलेली वाहने यामुळे या एकदिशा (वन-वे) मार्गावर अनेकदा वाहनधारकांची कसरत होते. मात्र, या सर्व घटना राजकीय वरदहस्तामुळेच होत असून, गेल्या काही वर्षात या मार्गांचे चित्र बदलले नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे.

भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या पंधरा लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत शहरातील प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेणे अपेक्षित होते. मात्र, भंडारा शहरातील बडा बाजार परिसर, गांधी चौक, नगर परिषद कार्यालय, राजीव गांधी चौक, जिल्हा परिषद चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंगची कुठेही व्यवस्था नाही. त्यामुळे अनेकजण विविध कामांसाठी थांबताना वाटेल तशी वाहने उभी करतात. याचा नाहक त्रास दररोज वाहतूक पोलिसांनाही होतो. बेशिस्त वाहनधारक आपल्या मनमर्जीने वागतात. मात्र, याचा रोष इतर नागरिकांसह वाहतूक पोलिसांना पत्करावा लागतो. शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते गांधी चौक परिसरापर्यंतचा मार्ग हा एकदिशा आहे. या एकदिशा मार्गावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरूच आहे. यामध्ये अनेक वाहनधारकांकडून दंडही वसूल केला जात आहे. मात्र, त्यातही काही अरेरावी करणारे वाहनधारक व राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांना काहीवेळा कारवाई करताना मर्यादा येतात. मात्र, याचा त्रास सर्वसामान्यांनाच सहन करावा लागतो. भंडारा शहरातील बडा बाजार मार्गावर कापड दुकाने, औषध, सोने-चांदी सराफांची दुकाने, भाजीपाला, पोलीस स्थानक, नगर परिषद, पोस्ट ऑफिस कार्यालय यासह अन्य विविध महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. शहरातील अरुंद रस्त्यावर नगर परिषदेने अद्यापही कोणता मास्टर प्लान तयार केला नसल्याने कित्येक वर्ष जुन्या अरुंद रस्त्यावरूनच वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची वाढलेली लक्षणीय संख्या विचारात घेता, शहरातील प्रमुख रस्ते अपुरे पडत आहेत. यासोबतच शहरात काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याची गरज आहे. बाजारात खरेदीसाठी आलेले नागरिकही बडा बाजार मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे अनधिकृत पार्किंग करत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते.

बॉक्स

वाहतूक पोलिसांशीही घालतात हुज्जत

बडा बाजार मार्गावरून अनेकदा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस वाहनधारकांना अस्ताव्यस्त वाहने उभी करू नका, म्हणून विनंती करतात. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात. काहीवेळा राजकीय मंडळींनाही फोन लावले जातात. त्यामुळे अनेकदा कारवाईत अडथळा येतो, मात्र यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

बॉक्स

दुकानांसमोरच केली जाते पार्किंग

भंडारा शहरात बडा बाजार मार्गावर वाहतुकीची समस्या गंभीर आहे. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी दुकानांसमोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात. नगर परिषद कार्यालयासमोर तर वाहने लावायलाच जागा राहात नाही. अशावेळी रस्त्यावरच पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक पोलीस अनेकदा अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र, तरीही वाहतूक नियमनासाठी नागरिकांचे अपेक्षित सहकार्य पोलिसांना मिळत नाही.

बॉक्स

वाहतूक नियमनासाठी फिरते पथक कार्यरत

भंडारा शहरातील एकदिशा मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोस्ट ऑफिस चौकात दोन वाहतूक पोलीस तर गांधी चौकात दोन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. यासोबतच वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्यासह पथक नेहमीच फिरत असते. अनेकदा स्वतः मुख्याधिकारी विनोद जाधव व पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

कोट

भंडारा शहरात वाहतूक नियमनासाठी त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता, नगर परिषद व वाहतूक पोलिसांच्या मदतीने एकदिशा मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

- शिवाजी कदम,

वाहतूक पोलीस निरीक्षक, भंडारा