शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोनाच्या सावटातही शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरिता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले ...

पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरिता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले आहेत, परंतु मनातील भीती दूर न झाल्याने शिक्षण विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, शिक्षक, पालक यांच्यात जागरूकता तयार होऊन कोरोनाविषयीची जनजागृती करून शाळेला शंभर टक्के उपस्थिती प्रेरणादायी आहे. हा कौतुकास्पद प्रकार चूलबंद खोऱ्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मऱ्हेगाव येथे अनुभवायला मिळालेला आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी पालक-शिक्षक सभा घेऊन पालकांच्या मनात असलेली कोरोनाविषयी भीती घालविल्यामुळे, तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा करून संरक्षणविषयक वातावरण निर्मिती केल्याने, शाळेत आज विद्यार्थ्यांची १००%उपस्थिती दिसत आहे.

कोरोना परीस्थितीत ९ महिन्यांच्या कालावधीनंतर २७ जानेवारी रोजी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या प्रगतीला चालना मिळावी. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने वर्ग ५ ते ७च्या शाळा सुरू करण्यासाचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांत शाळा सुरू झालेल्या नाहीत, परंतु ज्या ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तेथील विद्यार्थी उपस्थिती नगण्य आहे, परंतु याला अपवाद ठरत, लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेली मऱ्हेगाव शाळेत मात्र १०० टक्के उपस्थिती आढळून येते. याकरिता विशेष मेहनत शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक व गावातील सूज्ञ जागरूक पालक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक भोंडे, शिक्षक सतीश वासनिक, ज्ञानेश्वर कळंबे व विनोद चारमोडे या शिक्षकवृंदानी केलेले यशस्वी नियोजन, पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे असलेला कल व शिक्षकांचे उत्कृष्ट अध्यापन, भौतिक सुविधांची सोय यामुळेच हे शक्य झाले.

इतरही होतकरू शिक्षकांनी शिक्षणाविषयीची गोडी विद्यार्थ्यांना चाखण्याकरिता शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत कोरोना काळातही शाळा सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक लिंक खंडित होणार नाही व कोरोनाविषयी जनजागृती होत मनातली भीती दूर होईल, अशी अपेक्षा समाज मनातून उमटत मऱ्हेगाव येथील गावकऱ्यांचे, शिक्षकांचे कौतुक होत आहे.