शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले आहेत, ...

पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले आहेत, परंतु मनातील भीती दूर न झाल्याने शिक्षण विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, शिक्षक, पालक यांच्यात जागरूकता तयार होऊन कोरोनाविषयीची जनजागृती करून शाळेला शंभर टक्के उपस्थिती प्रेरणादायी आहे. हा कौतुकास्पद प्रकार चूल बंद खोऱ्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मऱ्हेगाव येथे अनुभवायला मिळालेला आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी पालक-शिक्षक सभा घेऊन पालकांच्या मनात असलेली कोरोनाविषयी भीती घालविल्यामुळे, तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा करून संरक्षण विषयक वातावरण निर्मिती केल्याने, शाळेत आज विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसत आहे.

कोरोना परिस्थितीत ९ महिन्यांच्या कालावधीनंतर २७ जानेवारी रोजी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या प्रगतीला चालना मिळावी. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने वर्ग ५ ते ७ च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत, परंतु ज्या ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तेथील विद्यार्थी उपस्थिती नगण्य आहे, परंतु याला अपवाद ठरत, लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेली मऱ्हेगाव शाळेत मात्र १०० टक्के उपस्थिती आढळून येते. याकरिता विशेष मेहनत शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक व गावातील सूज्ञ जागरूक पालक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक भोंडे, शिक्षक सतीश वासनिक, ज्ञानेश्वर कळंबे व विनोद चारमोडे या शिक्षकवृंदांनी केलेले यशस्वी नियोजन, पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे असलेला कल व शिक्षकांचे उत्कृष्ट अध्यापन, भौतिक सुविधांची सोय यामुळेच हे शक्य झाले.

इतरही होतकरू शिक्षकांनी शिक्षणाविषयीची गोडी विद्यार्थ्यांना चाखण्याकरिता शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत कोरोना काळातही शाळा सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक लिंक खंडित होणार नाही व कोरोनाविषयी जनजागृती होत मनातली भीती दूर होईल, अशी अपेक्षा समाज मनातून उमटत मऱ्हेगाव येथील गावकऱ्यांचे, शिक्षकांचे कौतुक होत आहे.