शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

कोरोनाच्या सावटातही शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले आहेत, ...

पालांदूर : कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यभर घोंगावत आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याकरता विविध प्राथमिक उपचाराची सूचना सर्वांना दिलेले आहेत, परंतु मनातील भीती दूर न झाल्याने शिक्षण विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, शिक्षक, पालक यांच्यात जागरूकता तयार होऊन कोरोनाविषयीची जनजागृती करून शाळेला शंभर टक्के उपस्थिती प्रेरणादायी आहे. हा कौतुकास्पद प्रकार चूल बंद खोऱ्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मऱ्हेगाव येथे अनुभवायला मिळालेला आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी पालक-शिक्षक सभा घेऊन पालकांच्या मनात असलेली कोरोनाविषयी भीती घालविल्यामुळे, तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा करून संरक्षण विषयक वातावरण निर्मिती केल्याने, शाळेत आज विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसत आहे.

कोरोना परिस्थितीत ९ महिन्यांच्या कालावधीनंतर २७ जानेवारी रोजी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या थांबलेल्या प्रगतीला चालना मिळावी. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने वर्ग ५ ते ७ च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत, परंतु ज्या ठिकाणच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तेथील विद्यार्थी उपस्थिती नगण्य आहे, परंतु याला अपवाद ठरत, लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेली मऱ्हेगाव शाळेत मात्र १०० टक्के उपस्थिती आढळून येते. याकरिता विशेष मेहनत शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक व गावातील सूज्ञ जागरूक पालक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक भोंडे, शिक्षक सतीश वासनिक, ज्ञानेश्वर कळंबे व विनोद चारमोडे या शिक्षकवृंदांनी केलेले यशस्वी नियोजन, पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे असलेला कल व शिक्षकांचे उत्कृष्ट अध्यापन, भौतिक सुविधांची सोय यामुळेच हे शक्य झाले.

इतरही होतकरू शिक्षकांनी शिक्षणाविषयीची गोडी विद्यार्थ्यांना चाखण्याकरिता शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत कोरोना काळातही शाळा सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक लिंक खंडित होणार नाही व कोरोनाविषयी जनजागृती होत मनातली भीती दूर होईल, अशी अपेक्षा समाज मनातून उमटत मऱ्हेगाव येथील गावकऱ्यांचे, शिक्षकांचे कौतुक होत आहे.