शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ओबीसींनो, विरोधी प्रवृत्तीच्या बिमोडासाठी संघटित व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे धोरण जाहीर करणाऱ्या केंद्र ...

ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे धोरण जाहीर करणाऱ्या केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि जातीनिहाय जनगणनेच्या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ओबीसीविरोधी केंद्र शासनाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतांना परिषदेच्या महिला पदाधिकारी बोलत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ओबीसी एकता जिंदाबाद नाऱ्यांनी व ओबीसी एकतेच्या पिवळया टोप्यांनी परिसर गजबजले होते.

ओबीसी धरणे आंदोलनात ओबीसी जनगणना परिषदेचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, महिला प्रदेशाध्यक्ष मंगलाताई वाडीभस्मे, भगीरथ धोटे, पांडुरंग फुडे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, मनोज बोरकर, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, केशव कहालकर, युवराज गोमासे, कमलेश सार्वे, भैय्याजी लांबट, ईश्वर निकुळे, गोपाल देशमुख, तुळशिराम बोंदरे, प्रभू मने, आनंदराव उरकुडे, उमेश सिंगनजुडे, जयंत झोडे, वामनराव वझाडे, रामचंद्र तरोणे, डॉ. आशिष माटे, आशिष वंजारी, सौरभ फरांडे, वामनराव गोंधुळे, रोशन उरकुडे, संजीव बोरकर, अज्ञान राघोते, मुरलीधर बुराडे, भगवान करंजेकर, माधवराव फसाटे, डी.एम. अतकरी, बाल बिसेन, रामलाल बोंदरे, सुनिलराव पराते आदी ओबीसी बांधव, महिला भगिनी व विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. घोषणा व नारेबाजी मनोज बोरकर यांनी केले. संचालन संजय आजबले यांनी तर, आभार प्रदर्शन गोपाल देशमुख यांनी केले.

बॉक्स

ही तर ओबीसींची दिशाभूल...

केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे जाहिर करून ओबीसींच्या जखमांवर मीठ चोळले. त्यास कडाडून विरोध झाल्याने आता ओबीसींची दिशाभूल करण्यासाठी केंद्राने मागासवर्ग निश्चित करण्याचे अधिकारी राज्यांना बहाल करण्याचे विधेयक संसदेत मंजूर केले. परंतू ओबीसी व सर्व मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यासंबंधीचे अधिकार हेतूपुरस्पर राज्यांना देण्यात आलेले नाहीत. ओबीसींसाठी काहीतरी करीत आहोत, असा गवगवा करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाचा आहे.

बॉक्स

तर राज्यांना जनगणनेचे अधिकार द्या

सर्वोच्च न्यायालयाने टाकलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याचे दृष्टीनेसुद्धा केंद्र शासनाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा ओबीसीवर केंद्राने घणाघात केला आहे. त्यामुळे सन २०२१ मध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्र शासन जनगणना करण्यास तयार नसेल किंवा असमर्थ असेल तर राज्य शासनांना तसे अधिकार देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादेची टाकलेली अट रद्द करण्याचे दृष्टीने घटना दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी धरणे आंदोलनातून ओबीसींनी केली आहे.