शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

ओबीसींनो, विरोधी प्रवृत्तीच्या बिमोडासाठी संघटित व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे धोरण जाहीर करणाऱ्या केंद्र ...

ओबीसी जनगणना परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूर्ती चौकात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे धोरण जाहीर करणाऱ्या केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि जातीनिहाय जनगणनेच्या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ओबीसीविरोधी केंद्र शासनाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतांना परिषदेच्या महिला पदाधिकारी बोलत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ओबीसी एकता जिंदाबाद नाऱ्यांनी व ओबीसी एकतेच्या पिवळया टोप्यांनी परिसर गजबजले होते.

ओबीसी धरणे आंदोलनात ओबीसी जनगणना परिषदेचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, महिला प्रदेशाध्यक्ष मंगलाताई वाडीभस्मे, भगीरथ धोटे, पांडुरंग फुडे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, मनोज बोरकर, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, केशव कहालकर, युवराज गोमासे, कमलेश सार्वे, भैय्याजी लांबट, ईश्वर निकुळे, गोपाल देशमुख, तुळशिराम बोंदरे, प्रभू मने, आनंदराव उरकुडे, उमेश सिंगनजुडे, जयंत झोडे, वामनराव वझाडे, रामचंद्र तरोणे, डॉ. आशिष माटे, आशिष वंजारी, सौरभ फरांडे, वामनराव गोंधुळे, रोशन उरकुडे, संजीव बोरकर, अज्ञान राघोते, मुरलीधर बुराडे, भगवान करंजेकर, माधवराव फसाटे, डी.एम. अतकरी, बाल बिसेन, रामलाल बोंदरे, सुनिलराव पराते आदी ओबीसी बांधव, महिला भगिनी व विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. घोषणा व नारेबाजी मनोज बोरकर यांनी केले. संचालन संजय आजबले यांनी तर, आभार प्रदर्शन गोपाल देशमुख यांनी केले.

बॉक्स

ही तर ओबीसींची दिशाभूल...

केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे जाहिर करून ओबीसींच्या जखमांवर मीठ चोळले. त्यास कडाडून विरोध झाल्याने आता ओबीसींची दिशाभूल करण्यासाठी केंद्राने मागासवर्ग निश्चित करण्याचे अधिकारी राज्यांना बहाल करण्याचे विधेयक संसदेत मंजूर केले. परंतू ओबीसी व सर्व मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यासंबंधीचे अधिकार हेतूपुरस्पर राज्यांना देण्यात आलेले नाहीत. ओबीसींसाठी काहीतरी करीत आहोत, असा गवगवा करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाचा आहे.

बॉक्स

तर राज्यांना जनगणनेचे अधिकार द्या

सर्वोच्च न्यायालयाने टाकलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याचे दृष्टीनेसुद्धा केंद्र शासनाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा ओबीसीवर केंद्राने घणाघात केला आहे. त्यामुळे सन २०२१ मध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्र शासन जनगणना करण्यास तयार नसेल किंवा असमर्थ असेल तर राज्य शासनांना तसे अधिकार देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादेची टाकलेली अट रद्द करण्याचे दृष्टीने घटना दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी धरणे आंदोलनातून ओबीसींनी केली आहे.