शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST

कोंढा (कोसरा) : आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेणे हा या समाजावरील घोर अन्याय ठरेल. असे करणे सामाजिक ...

कोंढा (कोसरा) : आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेणे हा या समाजावरील घोर अन्याय ठरेल. असे करणे सामाजिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर आणि निर्दोष प्रक्रिया पूर्ण करावी. ओबीसी समाजाला पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी माजी आमदार ॲड. रामचंद्र अवसरे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारची बेफिकीरी आणि चुकांची किंमत मराठा समाजाप्रमाणेच ओबीसीनांही मोजावी लागली आहे. या सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द केले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाची सुनावणी चालू असताना महाविकास आघाडी बेफिकिरीने वागली. न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही आणि सातत्याने तारखा मागितल्या. सांगितल्याप्रमाणे एक आयोग नेमून त्याद्वारे ओबीसींचे लोकसंख्येतील प्रमाण निश्चित करण्यासाठी इंपिरिकल डेटा मिळविणे आवश्यक आहे तसे केले तर हे आरक्षण पुन्हा मिळेल, म्हणून हे काम राज्य सरकारनेच करायचे आहे; पण आपले काम जबाबदारीने आणि तातडीने करण्याच्या ऐवजी येथेही राज्य सरकारकडून बेफिकिरी दिसून येते. न्यायालयाने ओबीसीचा जनगणना अहवाल नव्हे तर इंपिरिकल डेटा सादर करण्याचा आग्रह धरला असताना सातत्याने केंद्र सरकारकडून माहिती मिळविण्याचे कारण सांगत पुन्हा ओबीसींची दिशाभूल केली जात आहे. केंद्र सरकारने जनगणना माहिती दिली नाही म्हणून ओबीसी आरक्षण अडचणीत आले, हा आघाडीच्या नेत्यांच्या कांगावा वस्तुस्थितीला धरून नाही. या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र वाचावे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करणे थांबवावे, असेही अवसरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने तशी प्रक्रिया सांगितली आहे, तशीच ती पार पाडली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळेल, पण या बाबतीत महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता आणि बेफिकीरी दिसते. याचा आम्ही निषेध करतो, असे विलास काटेखाये यांनी सांगितले. यावेळी डाॅ. उल्हास हरडे, अनिल मेंढे, ॲड. महेंद्र गोस्वामी यांनीही संबोधित केले.

रस्ता रोको सुरू असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. मोहन सुरकर, राजेंद्र फुलबांधे, डॉ.उल्हास हरडे, प्रकाश कुर्झेकर, दत्तू मुनरतीवार, मच्छिंद्र हटवार, माधुरी नखाते, सीमा मोहिते, अमोल उराडे, सुरेंद्र आयतुलवार, मयुर रेवतकर, मोहन घोगरे, श्रीराम गाडेकर, पुरुषोत्तम गाडेकर, सोहेल खान, शिवाजी मुंघाटे व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, नंतर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सोडून दिले.