शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

एनएसएस विद्यार्थी शाळाबाह्यांच्या ‘शोधार्थ’

By admin | Updated: January 30, 2016 00:50 IST

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेत शिक्षण विभागाने ....

स्वयंसेवी संस्थांनाही दिले महत्त्व : ८५९ गावांमध्ये शोध मोहीम, शाळाबाह्य २५ विद्यार्थी सापडले, मोहिमेचा आज शेवट प्रशांत देसाई भंडाराशाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेत शिक्षण विभागाने आता राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. जिल्ह्यातील ८५९ गावातून ही मोहिम राबविण्यात येत असून यासाठी एनएसएसचे २ हजार ७८१ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने नानाविध योजना अंमलात आणल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे किंवा अन्य कुठल्या कारणाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर रहावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने राज्यभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली होती. या महिमेत शिक्षण विभागाला बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर दुसरी शोध मोहिम राबविण्यात आली. या दोन्ही मोहिमेत जिल्ह्यात २४९ शाळाबाह्य विद्यार्थी आढळले. यानंतरही अनेक ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधार्थ शिक्षण विभागासोबत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांचा व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. ही शोध मोहिम उद्या ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही मोहिम जिल्ह्यातील ८५९ गावांमधून राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एनएसएसचे २ हजार ७८१ स्वयंसेवकांची मदत घेतली असून १३३ समन्वयक व सात सनियंत्रन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात २५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे या शोध मोहिमेत आढळून आले आहे. यात सर्वाधिक १९ मुले भंडारा तालुक्यात तर मोहाडी पाच व तुमसर येथे एक विद्यार्थी आढळला आहे. पहिल्या सर्वेक्षणात आढळलेल्या २४९ शाळाबाह्य मुलांपैकी २२१ मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. तर उर्वरित ५३ मुले त्यांच्या मुळ जिल्ह्यात किंवा राज्यात परत गेल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. या सर्वेक्षणातील मुलांनाही शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था व एनएसएस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा सर्वे होत असल्याने त्यांच्या सर्वेक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.