शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

आता वैनगंगा शुद्धीकरणासाठी जनजागृती करणार

By admin | Updated: January 26, 2016 00:25 IST

नाग नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे भंडारा आणि पवनी येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे.

नाना पटोले : नाग नदीच्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यातभंडारा : नाग नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे भंडारा आणि पवनी येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विज्ञान व तंत्रज्ञान, वन व पर्यावरण सांसदीय स्थायी समितीचा मी सदस्य असून या विषयावर चर्चा करण्यासाठी नागपुरात पहिल्यांदा आली. आता वैनगंगा नदीचे पाणी शुद्ध होणार नाही, तोपर्यंत पाठपुरावा करणार असून वेळ पडल्यास माझ्या लोकांसाठी जनआंदोलन करीन, असे खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.यावेळी ते म्हणाले, पूर्व विदर्भात १.६९ लाख हजार हेक्टर जमिन झुडपी जंगलाच्या नावे आहे. ही जमिन निरूपयोगी पडून असलेली जमिन उपयोगात आली पाहिजे, यासाठी विधी न्याय सचिव, राज्याचे मुख्य सचिव यांचा समितीत समावेश करून झुडपी जंगलाचा योग्य अर्थ काढून ही जमिन लोकोपयोगी कामासाठी आली पाहिजे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निस्तार हक्काचा लाभ गावकऱ्यांना मिळालेला नसून हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. राज्यात दरवर्षी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४०० लोकांचा जीव जात आहे. वन्य प्राणी कायद्याची खरी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे सांगून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबांना आठ लाख रूपये, अपंगत्व आलेल्या इसमाला चार लाख रूपये, पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास ५० हजार, शेतीचे नुकसान झाल्यास एकरी १० हजार रूपये देण्याची तरतुद करावी, यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)‘भेल’ सुरू होणार ‘भेल’ला कॅबिनेटची मंजुरी असती तर आतापर्यंत ‘भेल’ पुर्णत्वास आला असता. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या १,०१७ कोटींची तांत्रिक अडचण आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असून योग्य दिवशी त्याची घोषणा करण्यात येईल, असे खा.पटोले यांनी स्पष्ट केले. मागील सरकारने मोहाडी - तुमसर या दोन तालुक्यात पाच औष्णिक वीज केंद्रासाठी जमिन खरेदी केली होती. परंतु या औष्णिक केंद्रामुळे आमच्या जिल्ह्यातील जमिन नापिक करायची नाही, अशी मागणी करून तत्कालीन पर्यावरण विभागाने परवाने तातडीने रद्द करावे, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.