शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

आता लाखनी सीसीटीव्हीच्या नजरेत

By admin | Updated: September 11, 2015 01:03 IST

वाढत्या गुन्हेगारी व गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते.

चंदन मोटघरे लाखनीवाढत्या गुन्हेगारी व गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते. पुराव्याअभावी अनेक गुन्हेगार निर्दोष सुटतात. मुरमाडी / लाखनी तीन मुलींच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर आले. त्या प्रकरणाची संदिग्धता कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील मुरमाडी लाखनी महत्वपूर्ण गाव आहे. त्या ठिकाणी सुरक्षितता राहावी यासाठी मुरमाडी ग्रामपंचायतने सीसीटीव्ही कॅमेरा लावून प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवण्याचे काम करीत आहेत.स्थानिक तहसील कार्यालय चौकात फिरता सीसीटीव्ही कॅमेरा उंचावर लावला आहे. ६०० मीटर लांबीची क्षमता असणार स्पीड डोम कॅमेरा चारही बाजूला फिरता राहणार आहे. १ जीबी मेमरी क्षमता असलेल्या कॅमेराचे कंट्रोल रुम तहसील कार्यालयात तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद कॅमेऱ्यात होणार आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या बक्षिस निधीतून १ लाख ३८ हजार रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेराचे कंत्राट टेक्नोसॉफ्ट सॉल्यूशन नागपूर यांना कंत्राट दिले होते. कॅमेराने काम करणे सुरु केले असून प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. लाखनी मुरमाडी परिसरात घरफोडी अपघाताच्या घटना रात्री बेरात्री होत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची माहिती लोकमत प्रतिनिधीला सरपंच राजेश खराबे यांनी दिली. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी १४ वित्त आयोगाच्या निधीतून अनेक ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. लाखनीची लोकसंख्या २५ हजारावर आहे तर मुरमाडीची लोकसंख्या १५ हजारावर आहे. मुरमाडी येथील घटनेमुळे प्रत्येक नागरिकांची सुरक्षिेतता महत्वाची झाली आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक चौक कॅमेरे लावून गैरकृत्यांना आळा घातला जाणार आहे.