शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

आता जन्म-मृत्यूची नोंद न्यायालयातून

By admin | Updated: August 4, 2016 00:30 IST

माहितीअभावी किंवा नजर चुकीने एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात केली गेली नसेल...

नागरिकांवर बसणार भुर्दंड : वेळीच दखल घेणे गरजेचे लाखनी : माहितीअभावी किंवा नजर चुकीने एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात केली गेली नसेल तर त्यांना आता जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्चाचा भुर्दंड बसणार आहे.याआधी जन्माच्या किंवा मृत्यूची नोंद करावयाची असल्यास ते अधिकार तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांना होते. यासाठी १०० रूपयांचा स्टँप पेपरवर सेतू करून जाहीरनामा काढावा लागत होता. हे सर्व काम तहसील कार्यालयांमधील अर्जनवीस करून देत होते. आता मात्र हे काम थेट न्यायालयामधून करावे लागत आहे.एखादा व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणजेच निबंधकाकडे जन्म मृत्यूच्या दाखल्याकरिता गेला तर ग्रामसेवक जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टर शोधून नोंद नसल्यास जन्म मृत्यू अनुउपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास देतो. ते अनुउपलब्धता प्रमाणपत्र घेऊन अर्जदाराला वकीलांकडे जावून जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ चे कलम १३ (३) अंतर्गत न्यायालयात संबंधित निबंधक / ग्रामसेवकाविरुद्ध जन्म मृत्यू च्या नोंदणीविषयी प्रकरण दाखल करावे लागते. या कामाकरिता अंदाजे ६ ते ८ महिन्यांचा कालावधीसुद्धा लागू शकतो. त्यामुळे अर्जदाराचे महत्वाचे काम वेळेवर होऊ शकत नानही. न्यायालयामध्ये अनेकदा जावे लागते. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस प्रकाशित करावी लागते. त्यासाठी खर्च येतो. एकुणच सदर जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी हजारो रूपयापर्यंतचा भुर्दंड बसतो. अनेकांना ही बाब माहित नसल्यामुळे अजूनही बहुतांश लोक तहसील कार्यालयामधील अर्जनवीसांकडे धाव घेतात. तोही विनाकारण भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)