शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

आता जन्म-मृत्यूची नोंद न्यायालयातून

By admin | Updated: August 4, 2016 00:30 IST

माहितीअभावी किंवा नजर चुकीने एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात केली गेली नसेल...

नागरिकांवर बसणार भुर्दंड : वेळीच दखल घेणे गरजेचे लाखनी : माहितीअभावी किंवा नजर चुकीने एखाद्या व्यक्तीच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंदणी जन्म मृत्यू नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयात केली गेली नसेल तर त्यांना आता जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्चाचा भुर्दंड बसणार आहे.याआधी जन्माच्या किंवा मृत्यूची नोंद करावयाची असल्यास ते अधिकार तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांना होते. यासाठी १०० रूपयांचा स्टँप पेपरवर सेतू करून जाहीरनामा काढावा लागत होता. हे सर्व काम तहसील कार्यालयांमधील अर्जनवीस करून देत होते. आता मात्र हे काम थेट न्यायालयामधून करावे लागत आहे.एखादा व्यक्ती ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणजेच निबंधकाकडे जन्म मृत्यूच्या दाखल्याकरिता गेला तर ग्रामसेवक जन्म मृत्यू नोंदणी रजिस्टर शोधून नोंद नसल्यास जन्म मृत्यू अनुउपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास देतो. ते अनुउपलब्धता प्रमाणपत्र घेऊन अर्जदाराला वकीलांकडे जावून जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ चे कलम १३ (३) अंतर्गत न्यायालयात संबंधित निबंधक / ग्रामसेवकाविरुद्ध जन्म मृत्यू च्या नोंदणीविषयी प्रकरण दाखल करावे लागते. या कामाकरिता अंदाजे ६ ते ८ महिन्यांचा कालावधीसुद्धा लागू शकतो. त्यामुळे अर्जदाराचे महत्वाचे काम वेळेवर होऊ शकत नानही. न्यायालयामध्ये अनेकदा जावे लागते. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस प्रकाशित करावी लागते. त्यासाठी खर्च येतो. एकुणच सदर जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी हजारो रूपयापर्यंतचा भुर्दंड बसतो. अनेकांना ही बाब माहित नसल्यामुळे अजूनही बहुतांश लोक तहसील कार्यालयामधील अर्जनवीसांकडे धाव घेतात. तोही विनाकारण भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)