शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

रस्ता नव्हे, हा तर मृत्यूमार्ग

By admin | Updated: November 4, 2016 00:54 IST

अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.

भंडारा : अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. वर्तमानस्थितीत रस्त्याहून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण नव्हे तर चक्क मृत्युला निमंत्रण देण्यासारखे आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा गर्भित इशाराही येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र ‘पळसाला पाने तीनच’ या युक्तीप्रमाणे या निवदेनालाही केराची टोपली दाखविण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणाहून उखडलेला आहे. मागील २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था जैसे थे अशीच आहे. या रस्त्याहून हनुमान नगर, आनंद नगर, समृद्धीनगर, अष्टविनायक नगर, आॅफीसर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अंबिका नगर तसेच खात रोड परिसरातील नागरिक रहदारी करीत असतात. शहरातील मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता म्हणूनही याची ओळख आहे. भरगच्च वस्ती असलेल्या प्रभागातील नागरिक या रस्त्याने रहदारी करीत असले तरी नगरपालिका प्रशासन रस्त्याच्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत हे एक न सुटणारे कोडे आहे. ठिकठिकाणाहून गिट्टी उखडलेली असल्याने दुचाकीस्वार अनेकवेळा स्लीप झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या उग्र रुप धारण करीत असते.मागील दोन दशकांपासून ही समस्या असताना नगरपालिका प्रशासनाने निवेदनाच्या माध्यमातून अनेकदा कळविण्यात आले. प्रभागातील नगरसेवकांचे आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे या रस्त्याची समस्या ही कायम आहे. या मार्गाहून जवळपास २ हजार नागरिक रहदारी करीत असल्याचे कळते. विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. प्रभागातील चारही नगरसेवकांना या समस्येबाबत कळविण्यात आले. कुणीही या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. परिसरातील नागरिकांकरिता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक, बाजार अशा मूलभूत स्थळी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु रस्त्याची दूरवस्था झाल्याने जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत आहे. सदर रस्त्याचे त्वरीत बांधकाम करून परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी आर्त हाक येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागू शकते. (प्रतिनिधी)