शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

रस्ता नव्हे, हा तर मृत्यूमार्ग

By admin | Updated: November 4, 2016 00:54 IST

अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.

भंडारा : अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. वर्तमानस्थितीत रस्त्याहून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण नव्हे तर चक्क मृत्युला निमंत्रण देण्यासारखे आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा गर्भित इशाराही येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र ‘पळसाला पाने तीनच’ या युक्तीप्रमाणे या निवदेनालाही केराची टोपली दाखविण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणाहून उखडलेला आहे. मागील २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था जैसे थे अशीच आहे. या रस्त्याहून हनुमान नगर, आनंद नगर, समृद्धीनगर, अष्टविनायक नगर, आॅफीसर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अंबिका नगर तसेच खात रोड परिसरातील नागरिक रहदारी करीत असतात. शहरातील मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता म्हणूनही याची ओळख आहे. भरगच्च वस्ती असलेल्या प्रभागातील नागरिक या रस्त्याने रहदारी करीत असले तरी नगरपालिका प्रशासन रस्त्याच्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत हे एक न सुटणारे कोडे आहे. ठिकठिकाणाहून गिट्टी उखडलेली असल्याने दुचाकीस्वार अनेकवेळा स्लीप झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या उग्र रुप धारण करीत असते.मागील दोन दशकांपासून ही समस्या असताना नगरपालिका प्रशासनाने निवेदनाच्या माध्यमातून अनेकदा कळविण्यात आले. प्रभागातील नगरसेवकांचे आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे या रस्त्याची समस्या ही कायम आहे. या मार्गाहून जवळपास २ हजार नागरिक रहदारी करीत असल्याचे कळते. विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. प्रभागातील चारही नगरसेवकांना या समस्येबाबत कळविण्यात आले. कुणीही या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. परिसरातील नागरिकांकरिता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक, बाजार अशा मूलभूत स्थळी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु रस्त्याची दूरवस्था झाल्याने जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत आहे. सदर रस्त्याचे त्वरीत बांधकाम करून परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी आर्त हाक येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागू शकते. (प्रतिनिधी)