शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

ना शाळा, ना परीक्षा, दोन लाखांवर विद्यार्थी झाले पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंदच होत्या. पण पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा बंदच होत्या. पण पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पण अनेक पालकांनी संसर्ग लक्षात घेता, आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ही अल्पच होती. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरलेच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गत दीड वर्षापासून शाळेचे आणि शिक्षकांचेसुद्धा दर्शन झालेच नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७९४, अनुदानित ३४१ आणि विनाअनुदानित १५८ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्ष कोरोनामुळे तसेच गेले. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. हा उपक्रम शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरत असला तरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याने या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून उत्तीर्ण केले जाणार आहे.

बॉक्स

शहर आणि गावात असे होते शिक्षण...

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा कमी आणि नुकसान अधिक झाले आहे. शहरी भागात सर्व सुविधा असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास केला. मात्र ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्क आणि ॲन्ड्राॅइड मोबाइलची समस्या यामुळे गरीब विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहिला. ऑनलाइन अभ्यासामुळे त्यांना बराच अभ्यासक्रम लक्षातदेखील आला नाही. त्यातच आता मागील वर्गातील अभ्यासक्रम समजला नसताना पुढील वर्गात वर्गोन्नत केल्याने त्यांना अभ्यासात अडचणी निर्माण होणार आहेत, तर अजूनही यंदा नवीन शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होते, हे निश्चित सांगता येत नाही.