शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवाच्या विषयावर राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

भंडारा : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी ...

भंडारा : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी व जनतेचे हित आणि सुरक्षिततेची भावना लक्षात घेता रात्रीच्या लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात आला. रोज कोविडच्या हजारो चाचण्या होत आहेत. भाजपशासित राज्यात चाचण्या नगण्य आहेत. विरोधक मात्र मानवी जीवाच्या विषयावर राजकारण करीत असून लोक मरताहेत तर मरू द्या, या भूमिकेत असल्याचा, घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मंगळवारी सकाळी ११ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, प्रशांत देशकर, धनराज साठवणे, अजय गडकरी आदी उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांचे शेकडो पोती धान मिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रेशरमुळे धानाचे मिलिंग करता आले नाही. आताही अनेक शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मुदतवाढ संदर्भात मागणी केली आहे. तांदळाच्या उतारासंदर्भातही केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोषित करण्यात आलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्यात कर्मचारी पद भरती संदर्भातही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकारचे काम ऑलबेल सुरू आहे, मात्र विरोधक नाहक आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी घोषित करण्यात आलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. कुणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. फक्त घोषणा व जुमलेबाजी देऊन वेळ मारून नेण्यात आल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

बॉक्स

मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही

वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता नाना पटोले म्हणाले, वीज ग्राहकांना कुठलीही सुविधा व त्रास निर्माण होता कामा नये, या मताचे आम्ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजेच्या देयकाचा भरणा केल्यास त्यापोटी वीज वितरण कंपनीला तोटा कमी प्रमाणात सहन करावा लागेल. मात्र आपण ऊर्जा खात्याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने केव्हाही मंत्रिपद मला मिळू शकते, मात्र आपण त्या संदर्भात कुठलाही विचार केलेला नाही किंवा आपण कुठल्याही शर्यतीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.